Tanaji Sawant : ‘तर’ मुख्यमंत्र्यांसहित एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, मराठा समाजातील नेते आक्रमक
मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन […]
ADVERTISEMENT

मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
सावंत यांच्या या वक्तव्यावरुन समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय मराठा समाजातील नेतेही सावंताविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, वक्तव्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनातील समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.
काय म्हणाले योगेश केदार?
योगेश केदार म्हणाले, सावंत यांनी मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने विरोध केला. आंदोलकांना विरोधी पक्षांनी सोडलेली पिलावळ असे संबोधित केले. तसेच आज ओबीसीतून आरक्षण मागत आहे दोन महिन्यांनी एससी मधून आरक्षण मागतील, असेही बोलले.
यातून सावंत यांनी दलित समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. उलट दलित समाज मराठ्यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देत आहे. कारण त्या समाजातील जाणकारांना माहिती आहे की, मराठा समाज एससीचे आरक्षण मागत नाही. हे वास्तव तानाजी सावंत यांना माहिती नसावे.