Live Updates : राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

राहुल नार्वेकर यांचं नवाब मलिक यांचं अभिनंदन करत असतानाच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कानात सांगितलेलं अडीच वर्षापूर्वी ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती असं त्यांनी म्हटलं आहे. राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. आम्ही सर्वच जण आपल्याबद्दल बोलतो आहोत. माझ्याही आठवणी आहेत. आजचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राहुल नार्वेकर यांचं नवाब मलिक यांचं अभिनंदन करत असतानाच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कानात सांगितलेलं अडीच वर्षापूर्वी ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. आम्ही सर्वच जण आपल्याबद्दल बोलतो आहोत. माझ्याही आठवणी आहेत. आजचं मतदान ग्राह्य धरायचं, व्हीप कुणाचा हे सगळं नंत बोलू. देवेंद्र फडणवीस यांच्या कानात आम्ही अडीच वर्षांपूर्वी जे सांगितलं होतं ते त्यांनी ऐकलं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षापूर्वीच दिसली असती.

राहुल नार्वेकर यांच्या शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी अभिनंदन केलं. राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, राष्ट्रवादीत गेले त्यानंतर भाजपमध्ये गेले. मात्र आम्ही तुमच्याकडे कायदा मंत्री म्हणून पाहात होतो. मात्र तुम्हाला विधानसभा अध्यक्ष केलं गेलं. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहात होतो पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. आम्ही आमचं दुःख विसरलो आणि त्यांंच्याविषयी आम्हाला जास्त दुःख वाटलं. तसंच ३९ सदस्यांनी व्हीप झुगारून जे मतदान केलं आहे ती लोकशाहीची पायमल्ली आहे असंही परखड मत सुनील प्रभू यांनी व्यक्त केलं

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले, त्यांच्या तुफान फटकेबाजीची चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp