आमदार बांगर अन् खासदार पाटील यांना पुन्हा गुलाल नाही : नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची शपथ

मुंबई तक

हिंगोली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यात विस्कळीत झालेली शिवसेना सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पक्षात घेतले आहे. त्यानंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी संतोष टारफे आणि अजित मगर या बांगर यांच्यां दोन प्रतिस्पर्ध्यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हिंगोली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यात विस्कळीत झालेली शिवसेना सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पक्षात घेतले आहे. त्यानंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी संतोष टारफे आणि अजित मगर या बांगर यांच्यां दोन प्रतिस्पर्ध्यांना पक्षात घेतले आहे. याशिवाय ठाकरे यांनी दोन नवीन जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छावा दलाचे विनायक भिसे आणि संदेश देशमुख या दोघांची जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. या दोघांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून हिंगोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी विनायक भिसे यांनी आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांना येत्या निवडणुकीत विधानसभेची पायरी चढू देणार नाही, त्यांना पुन्हा गुलाल लागू देणार नाही अशी शपथ घेतली.

जयंत पाटलांसमोरच अमोल मिटकरींची नाचक्की : थेट जिल्हाध्याकडून कमिशनखोरीचा आरोप

काय म्हणाले विनायक भिसे?

‘मुंबई तक’शी बोलताना विनायक भिसे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी आम्हाला आहोरात्र झटावे लागणार आहे. पण शिवसेनेचा झेंडा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संतोष बांगर यांच्या आव्हानाविषयी बोलताना भिसे म्हणाले, बांगर यांचे आव्हान, ताकद हे काहीच नाही. किरकोळ आणि चिल्लर माणूस आहे. त्याची दहशत आम्ही मोडून काढतो. उलटं त्यालाच आमचे आव्हान कालही होते आणि आजही आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp