“संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं चिन्हही” मनसेची शिवसेनेवर प्रतिक्रिया

मुंबई तक

शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे जो उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी संपलेला पक्ष असा केला होता. त्यानंतर आता त्याच अनुषंगाने मनसेच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अमेय खोपकर यांनी काय म्हटलं आहे? चिन्हं बदलतात… […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे जो उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी संपलेला पक्ष असा केला होता. त्यानंतर आता त्याच अनुषंगाने मनसेच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अमेय खोपकर यांनी काय म्हटलं आहे?

चिन्हं बदलतात… कुणाची गोठतात. आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतं आहे असं ट्विट मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केलं आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काय ट्विट केलं आहे?

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं चिन्हही कालाय तस्मै नमः असं म्हणत मनसेच्या संदीप देशापांडे यांनी ट्विट करत या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp