भर पावसात ४ किमी पळत गुजरात बॉर्डर गाठून शिवसेना आमदाराने गाठली मुंबई-संजय राऊत
शिवसेना मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई य़ांच्यासह ३३ जण माझ्यासोबत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या बंडखोरीबाबत जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण केल्याचा आरोप भाजपवर केला आहे. एवढंच नाही तर एक आमदार […]
ADVERTISEMENT

शिवसेना मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई य़ांच्यासह ३३ जण माझ्यासोबत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या बंडखोरीबाबत जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण केल्याचा आरोप भाजपवर केला आहे. एवढंच नाही तर एक आमदार कसा पळून आला ते देखील सांगितलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
सोमवारी विधान परिषदेचं मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतल्या काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचं असं आमदारांना सांगितलं. यानंतर संध्याकाळी विविध वाहनांमध्ये बसवून ठाण्याच्या दिशेने नेण्यात आलं. ठाणे ओलांडून गेल्यानंतरही वाहनं थांबत नव्हती. पुढे एकनाथ शिंदे आहेत त्यांना भेटून पुढे जायचं आहे असं या सगळ्यांना सांगण्यात आलं. ही सगळी वाहनं महाराष्ट्र गुजरात सीमेवर थांबवण्यात आली.
यावेळी कैलास पाटील यांच्या मनात पाल चुकचुकल्याने त्यांनी लघुशंकेचा बहाणा केला. अंधारात कुणालाही दिसमार नाही या पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. अंधाराचा रस्ता, पाऊस या सगळ्यात चार किमी भिजत चालत जाऊन त्यांनी हे अंतर कापलं. समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या एका दुचाकीची लिफ्ट घेतली. दुचाकीस्वार गाव आल्याने थांबला त्यानंतर कैलास पाटील यांनी पुन्हा पायी प्रवास सुरू केला. एका ट्रकला लिफ्ट मागून ते दहीसरला पोहचले. त्यानंतर आपल्या वाहनाने त्यांनी वर्षा बंगला गाठला. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.