Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचं महाराष्ट्राला पत्र; म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून…’

मुंबई तक

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल झालीये. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशच्या भूमीत पाऊल ठेवण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला निरोपाचं पत्र लिहिलंय. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात घालवण्यानंतर राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले-शाहू-आंबेडकर संतांचा उल्लेख भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र राहुल गांधी म्हणतात, ‘महाराष्ट्रात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल झालीये. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशच्या भूमीत पाऊल ठेवण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला निरोपाचं पत्र लिहिलंय. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात घालवण्यानंतर राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले-शाहू-आंबेडकर संतांचा उल्लेख भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र

राहुल गांधी म्हणतात, ‘महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन सुरू झाला आणि शिवाजींचा मातृ जिल्हा (जिजाऊ मांसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेशमध्ये जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संतांच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत.”

राहुल गांधी पुढे म्हणतात, “महाराष्ट्रातील जनतेनं या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिलं. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येनं नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व आबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे ह्रदय, मन भरून आले आहे.”

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ५ बदल झालेत!

हे वाचलं का?

    follow whatsapp