Shiv Sena: ‘गुजरात लॉबीचं स्वप्न.. नार्वेकरांनी खंजीर खुपसला..’, निकालानंतर संजय राऊतांच्या संतापाचा कडेलोट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

rahul narwekar stabbed maharashtra in the back sanjay raut angry reaction after shiv sena mla disqualification verdict
rahul narwekar stabbed maharashtra in the back sanjay raut angry reaction after shiv sena mla disqualification verdict
social share
google news

Sanjay Raut vs Rahul Narwekar: मुंबई: आमदार अपात्रता याचिकेवर (MLA Disqualification) निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना (ShivSena) ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचा निकाल दिला. तसंच शिंदेंनी नेमलेले व्हीप भरत गोगावले यांची नियुक्ती देखील योग्य असल्याचं म्हटलं. याच निकालानंतर शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. (rahul narwekar stabbed maharashtra in the back sanjay raut angry reaction after shiv sena mla disqualification verdict)

‘राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपचं एक स्वप्न होतं की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उखडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न हे घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं.’ असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर तुफान टीका केली.

संजय राऊतांच्या संतापाचा कडलोट… वाचा राऊत काय म्हणाले ते जसंच्या तसं!

‘नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला’

‘जी दिल्लीवरून ‘ऑर्डर’ मिळाली आहे.. ती ‘ऑर्डर’ इथे दिली आहे. संविधान, कायदा, नियम.. सत्य काय आहे याबाबत निकाल नाही.. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना.. जिची 60 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. त्यावेळी आज जे शिवसेनेचे मालक आहेत मिस्टर शिंदे.. त्यांचं वय काय होतं? त्यांचा जन्म तरी झाला होता का? आज ते शिवसेनेचे मालक आणि बाळसाहेब ठाकरेंची शिवसेना इतिहासजमा झाली. भाजपचं हे मोठं षडयंत्र आहे.. एक मोठं स्वप्न होतं की, एके दिवशी आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवून टाकू.. पण शिवसेना अशी संपणार नाही.. तुमच्या एका निर्णयाने..’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Big Breaking: ‘Shiv Sena ही शिंदेंचीच, व्हीपही..’, नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निकाल

‘शिवसेना जनतेत आहे.. महाराष्ट्राच्या नसानसात आहे.. जो आजचा निर्णय आहे तो निकाल नाही, न्याय नाही.. ते एक षडयंत्र आहे.. आम्ही सुप्रीम कोर्टात नक्की जाऊ.. हे जे कोणी विधानसभेचे अध्यक्ष आहेत ज्यांना लवादाचा अधिकार दिला होता त्यांना एक मोठा इतिहास लिहिण्याची संधी मिळाली होती. संविधानाच्या आधारावर निर्णय देण्याचा आणि इतिहास निर्माण करण्याची संधी मिळाली होती. पण ती संधी त्यांनी दवडली..’

‘या व्यक्तीने देखील महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ज्यांनी निर्णय दिला आहे त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल.. ज्यांनी कोणी निकाल दिलाय आणि जे आज या निकालानंतर टाळ्या वाजवत आहेत.. ते सर्व महाराष्ट्रातील गद्दार आणि बेईमान आहेत. त्यांची स्थिती मुसोलिनीसारखी होईल.’ अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

‘शिवसेना चोरमंडळाच्या हातात सोपविण्याचा अधिकार कोणी दिला?’

‘ही मॅच फिक्सिंगच आहे.. दुसरं काही नाही.. प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा यांना अधिकार नाही.’

ADVERTISEMENT

‘ज्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक दिल्ली करते.. दिल्लीच्या मेहरबानीने ते त्या खुर्चीवर बसतात, त्यांचे आदेश पाळतात.. ते शिवसेनेचं भविष्य काय ठेवणार? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्हाला अशा प्रकारे चोरमंडळाच्या हातात सोपविण्याचा अधिकार कोणी दिला? ज्यांनी हे निर्णय दिले.. जे आज आनंद व्यक्त करतायेत त्यांच्या म्होरक्यांची अवस्था ही मुसोलिनीसारखी होईल.’

ADVERTISEMENT

‘आमचं आव्हान आहे.. निवडणुका घ्या.. निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे.. की, भरत गोगावले हे बेकायदेशीर व्हीप आहेत. सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत. राज्यपालांनी केलेली संपूर्ण कृती बेकायदेशीर आहे. राज्यपालांना बहुमत ठरविण्याचा अधिकार नाही हे कोर्टाने सांगितलं आहे. या देशाचं सर्वोच्च न्यायलय शहाणे की हे आता बसलेले दीड शहाणे?’ अशा बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह राहुल नार्वेकरांवरही टीका केली आहे.

‘भाजपचं एक स्वप्न होतं की, शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उखडून फेकू…’

‘भाजपचं एक स्वप्न होतं की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उखडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न हे घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं आणि मराठी माणूस त्याला क्षमा करणार नाही.’

‘ज्यांनी गद्दारी केली… शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला.. ज्यांनी महाराष्ट्रद्रोह्याशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केलं त्यांना अपात्र करणं हाच कायदेशीर मार्ग होता. विधानसभा अध्यक्ष किती खोटरडेपणे वागले हे कोर्टात सिद्ध करू.’

हे ही वाचा>> MLA Disqualification : आमदार अपात्रता निकालावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आता सुप्रीम कोर्टाकडून…’

‘तांत्रिक मुद्द्यावर शिवसेना बनलेली नाही.. कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले…? त्यांची औकात काय आहे? कोण विधानसभा अध्यक्ष? ते ठरवणार..’

’40 आमदार निघून गेले तर पक्ष त्यांचा झाला? विधानसभा अध्यक्ष फक्त हे ठरवू शकतो की, विधिमंडळ पक्ष कोणाचा आहे.. तिथे कोणाचं बहुमत आहे. पण संपूर्ण पक्ष, चिन्ह देण्याचा अधिकार त्यांना नाही. बेकायदेशीर विधानसभा अध्यक्षांनी हा बेकायदेशीर दिलेला निर्णय आहे.’ असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT