“मराठी माणसाला डिवचू नका” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी टीकेची झोड उठते आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिला आहे. राज ठाकरे यांनी एक खरमरीत पत्र राज्यपालांना […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी टीकेची झोड उठते आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिला आहे. राज ठाकरे यांनी एक खरमरीत पत्र राज्यपालांना लिहिलं आहे.
काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत. याचबाबत आता राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?
कोश्यारींची होशियारी? असं नाव या पत्राला देण्यात आलं आहे.
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात, मात्र आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
महाराष्ट्रातील मराठी माणसानं येथील मनं आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?