Savarkar row : सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो? समजून घ्या 5 मुद्द्यांमध्ये

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो?
सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो?
social share
google news

savarkar apologize rahul gandhi politics :मोदी आडनाव (Modi Surname case) प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खासदारकी रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकर अस्त्र बाहेर काढलं होतं.’माझं नाव सावरकर नाही आहे’, ‘माझं नाव गांधी आहे’.’गांधी कधी माफी मागू शकत नाही’ असे विधान करून त्यांनी भाजपला चांगलेच डिवचले होते. ज्या ज्या वेळेस राहूल गांधी राजकीय अडचणीत सापडतात, त्या त्या वेळेस ते या अस्त्रांचा वापर करतात. असे अनेकदा दिसून आले.सध्याच्या परीस्थितीत सुद्धा तेच सूरू आहे.मात्र सततच्या सावरकर ( VD Savarkar) अस्त्राच्या प्रयोगाने महाराष्ट्रात नेहमीच कॉग्रेसची अडचण झाली आहे. सद्यपरिस्थितीत देखील महाराष्ट्रात राहूल गांधीच्या (Rahul Gandhi) सावरकर अस्त्राने महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत. ही पहिलीच वेळ नाही आहे,याआधी देखील कॉग्रेस अडचणीत आली होती. हे प्रसंग कोणते होते? आणि राहूल गांधी सावरकरांबद्दल काय म्हणाले होते? हे जाणून घेऊयात. (savarkar apologize rahul gandhi politics maharashtra shivsena uddhav thackerey maharashtra politics)

राहुल गांधींना ठाकरे गटाचा इशारा

राहूल गांधी यांनी सावकरांबद्दल विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.एकीकडे राहूल गांधीवर झालेल्या कारवाईला ठाकरे गट विरोध करत असताना, दुसरीकडे मात्र सावरकरांवरील विधानाने ठाकरे गटाला राहूल गांधींना इशारा देण्याची वेळ आली होती. देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फोडू नका.सावरकर आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. मालेगावच्या शिवगर्जना सभेत त्यांनी हे विधान केले होते. या भूमिकेनंतर कॉग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या डिनर बैठकीवर देखील शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा : शरद पवारांची मध्यस्थी! राऊतांची राहुल गांधींसोबत चर्चा, काय घडलं?

स्वातंत्र्याच्या लढाईत सावरकरांचा सहभाग

देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सावरकर आणि महात्मा गांधीचा या दोघांचे मोठे योगदान आहे. दोघांच्या विचारधारेतही काहीच फरक नव्हता. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेवर भर दिला, तर सावरकरांनी टोकाच्या क्रांतीचे समर्थन केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान 1910 साली नाशिकच्या इंग्रज कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली होती. अभिनव भारत संस्थेच्या लोकांनी ही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा होता. सावरकरांनी अभिनव भारत ही संस्था स्थापन केली होती. मात्र ज्यावेळेस जॅक्सनची हत्या झाली. त्यावेळी सावरकर लंडनमध्ये होते. ज्या बंदूकीतून जॅक्सनची हत्या झाली होती, ती बंदूक सावरकरांनी लंडनहून भाऊ गणेशसाठी पाठवली होती. तर जॅक्सनवर ज्या व्यक्तीने गोळी चालवली होती त्याचे नाव कान्हेर होते. त्याना नंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हे ही वाचा : शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!

सावरकरांचा माफीनामा

या प्रकरणात सावरकरांना भारतात आणून खटला चालवला गेला होता. हत्या आणि राष्ट्रदोहाच्या नावाखाली 25-25 वर्षाची शिक्षा अंदमान निकोबारच्या जेलमध्ये दिली गेली होती. याच शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा देखील म्हणतात. या शिक्षेतून सुटका व्हावी यासाठी सावरकरांनी एक नव्हे तर सहा वेळा दयेची याचिका केली होती. इंग्रज सरकार अनेकदा राजकिय कैंद्याकडून माफीनामा पत्र लिहून सोडायचे.त्यामुळे सावरकरांनी दया याचिकेसाठी सहा वेळा माफीनामा पत्र लिहले होते. सावरकर 9 वर्ष 10 महिने जेलमध्ये होते.

ADVERTISEMENT

राहूल गांधी सावरकरांबद्दल कधी आणि काय-काय म्हणालेत?

राहूल गांधी यांनी पहिल्यांदा 14 डिसेंबर 2019 साठी रामलीला मैदानात भारत बचाओ रॅलीत सावरकरांवर टीका करत भाजपवर निषाणा साधला होता. झारखंडच्या रॅलीत राहूल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ विधानावर भाजपाने माफी मागण्याची मागणी केली होती.’ही लोक सांगतात माफी मांगा’.’माझे नाव राहुल सावरकर नाही आहे’, ‘राहुल गांधी आहे’.’मरण पत्करेन, पण माफी मागणार नाही’, असे विधान त्यावेळेस राहूल गांधी यांनी केले होते. यानंतर अनेकदा ते सावरकरांचा आधार घेऊन सोयीनुसार राजकारण करत राहिले.

ADVERTISEMENT

नोव्हेंबर 2022 मध्ये भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका करत भाजपला लक्ष्य केलं होते. एकीकडे बिरसा मुंडा सारखे महान व्यक्तिमत्व आहे, जे कधीही इंग्रजांसमोर झुकले नाही, आणि दुसरीकडे सावरकर, जे इंग्रजांसमोर माफी मांगत होते. दोन तीन वर्ष यांना अंदमानमध्ये बंद केल्यानंतर त्यांनी चिठठी लिहण्यास सुरू केली, मला माफ करा.तुम्हाला आमच्याकडून जे पाहिजे ते घ्या, पण मला तुरूंगातून बाहेर काढा,असे राहुल गांधी यांनी सांगितले होते.

दरम्यान मध्यंतरी कॉंग्रेसच्या अकाउंटवरून राहूल गांधीचा गाडी चालवताना फोटो ट्विट केला होता. ‘सावरकर समजलात का, नाव राहुल गांधी आहे’.ज्या ज्या वेळेस राहूल गांधी यांच्यावर माफी मांगण्याचा प्रसंग येतो. त्या त्या वेळेस ते ‘मी सावरकर नाही तर गांधी आहे’ असे उत्तर देताना दिसले आहेत.

राजकारणासाठी सावरकरांचा आधार का घेतात?

राहुल गांधी यांनी सावरकरांचा आधार घेऊन नेहमी भाजप आणि आरएसएसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी संघ विचारधारेच्या नेत्यांचे स्वातंत्र्याच्या आंदोलनात काहीच योगदान नसल्याचे पटवून देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. तसेच सावरकरांनी माफी मागून स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कॉग्रेस पार्टी महात्मा गांधीच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, तर सावरकरांची विचारधारा असणारी माणसं गांधीचे हत्यारे आहेत, असे पटवू देत राहीले आहेत.

महाराष्ट्रात कॉग्रेसला अडचण?

महाराष्ट्रात भाजप आणि ठाकरे गट सावकरांना महान स्वातंत्र्यसैनिक मानतात. तर राहुल गांधी सावरकरांविरूद्ध भूमिका घेऊन महाराष्ट्रात अडचणीत सापडतं.महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांचा नाईलाज आहे की त्यांना राहुल गांधींच्या वक्तव्याचा बचाव करावा लागतो.मात्र सावरकरांना मुद्दा विनाकारण छे़डू नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सावरकरांविरूद्ध विधान करून महाराष्ट्रात राजकीय हित साधता येणार नाही. दरम्यान राहुल गांधी वारंवार सावरकरांवर निषाणा साधत आहेत. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी येत आहे. जर राहुल गांधी यांनी सावरकरांविरूद्ध विधान बंद केली नाहीत, तर एकत्र राहणे अवघड होईल,असा इशाराचा दिला आहे.आता राहुल गांधी ठाकरेंचा इशारा किती गंभीरतेने घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT