…तेव्हा उद्धवसाहेब पवारांच्या मांडीवर आणि सोनिया गांधींच्या पायाशी बसले नव्हते- रामदास कदम
कोकणात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. मात्र या ऐन गणेशोत्सवात कोकणात राजकीय शिमगा सुरू झाला आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या जहरी टीकेला रामदास कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तेव्हा उद्धवसाहेब शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते- रामदास कदम रामदास […]
ADVERTISEMENT
कोकणात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. मात्र या ऐन गणेशोत्सवात कोकणात राजकीय शिमगा सुरू झाला आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या जहरी टीकेला रामदास कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
तेव्हा उद्धवसाहेब शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते- रामदास कदम
रामदास कदम म्हणाले, ”भास्कर जाधव यांना माझं आव्हान आहे, त्यांनी त्यांचं तोंड लवकर उघडावं.. ते कधी तोंड उघडताहेत याची मी वाट बघतोय… मी कृतघ्न आहे. बेईमान आहे असं त्यांनी मला म्हटलं आहे. जेव्हा मी शिवाजी पार्कवर उद्धवजींसमोर भाषण केलं, तेव्हा उद्धवसाहेब शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते. तेव्हा सोनिया गांधींच्या पायाशी ते बसले नव्हते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व त्यांच्यासोबत होतं, याची माहिती करून घ्या आणि मग बोला, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्ला चढवला आहे.
पुढे रामदास कदम म्हणाले ”कृतघ्न कोण आहे, बेईमान कोण आहे हे मला बोलायला लावू नका, जे वास्तव आहे ते आम्ही बोलतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही वाचवतोय आणि भास्कर जाधव तुमच्याकडून मला शिवसेना शिकण्याची आवश्यकता नाही, मी कडवा शिवसैनिक आहे. मी कुठल्या पक्षात जाऊन आलेलो नाही. आपण कोणावर काय बोलताय हे विचार करून बोला. मला शक्यतो कोकणात शिमगा नको होता, पण सुरुवात तुम्ही केलीत मग शेवट करण्यासाठी रामदास कदम सक्षम आहे असं आव्हान रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना दिलं आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
भास्कर जाधव काय म्हणाले होते?
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, शिवाजी पार्कवर कोणी मेळावा घ्यावा आणि कोणी घेऊ नये हे सांगणारे रामदास कदम कोण? मुळातच या मेळाव्यांमध्ये रामदास कदमांनी ठाकरेंच्या उपस्थितीत भाषणं केली, ते रामदास कदम एवढे कृतघ्न कसे होऊ शकतात. रामदास कदम यांच्यासारखा खोटारडा माणूस मी कधी पाहिला नाही. त्यांचा भांडाफोड मी करणारच आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती.
ADVERTISEMENT