शिवसेना: ‘BJP फक्त तुमचा..’ ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊत संतापले
Sanjay Raut expressed anger: मुंबई: ऐन होळीच्या (Holi) दिवशी ठाण्यातील शिवाई नगर परिसरातील शिवसेना शाखा (Shiv Sena Shakha) ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले. यावेळी या संपूर्ण परिसरात तुफान राडा झाला. ज्यावरून आता शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटाला इशारा […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut expressed anger: मुंबई: ऐन होळीच्या (Holi) दिवशी ठाण्यातील शिवाई नगर परिसरातील शिवसेना शाखा (Shiv Sena Shakha) ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले. यावेळी या संपूर्ण परिसरात तुफान राडा झाला. ज्यावरून आता शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटाला इशारा देताना असंही म्हटलं की, ‘भाजप त्यांचा फक्त वापर करून घेत आहेत. भविष्यात त्यांना कळेल की, त्यांनी केवढी मोठी चूक केली आहे ते.’ (shiv sena sanjay raut was furious after the controversy over shiv sena shakha in thane)
ठाण्याच्या राड्यानंतर राऊतांनी शिंदेंना सुनावलं
‘ज्या पद्धतीने हे लोकं पोलीस, सत्तेचा वापर करून जे काही खेचून घेत आहेत ते आम्ही परत आणू. ही फक्त काही दिवसाची बाब आहे. ही सत्ताही राहणार नाही, आणि दादागिरी देखील चालणार नाही. पोलिसांचा जो वापर होतोय आमच्या लोकांसाठी त्याचा अर्थ असा की, आपण घाबरला आहात. हिंमत असेल तर समोर येऊन लढा. तेव्हा काय ते आम्ही पाहू. सरकार तर पडणार आहेच.. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याची आम्ही वाट पाहतोय.’
‘ठाण्यात अशा काही घटना घडत आहे. कारण या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतंच आहे. ठाण्याच्या बाहेर काही नाही. लवकरच ते सुद्धा संपेल. फार काळ टिकणार नाही. विशेषत: खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या आहेत. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरात जातील.’