उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक झाल्यास फायदा कोणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं या वादाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय. आणि निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे दोघांचं बहुमत जोखून निर्णय दिला जाणार आहे. पण हा निर्णय काही लगेच येत नाही. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. दुसरीकडे भारतात निवडणूक ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय होण्याआधीच निवडणूक लागली, तर दोन्ही बाजूंना धनुष्यबाणाशिवाय रिंगणात उतरावं लागेल. त्यामुळे धनुष्यबाणाशिवाय निवडणूक झाली, तर कोणाला फायदा होईल आणि कोणाचा तोटा होईल? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंतल्या संघर्षात धनुष्यबाणावर आता निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. आयोगाच्या चेंडू तीन गोलमध्ये जाऊ शकतो. एक गोल आहे शिंदेंचा, दुसरा गोल आहे ठाकरेंचा आणि तिसऱ्या गोलमध्ये चेंडू गेल्याच सामना ड्रॉ होईल. म्हणजेच धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल.

तिसऱ्या परिस्थितीत निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना दोन वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला जातो. असं झालं, तर मग फायदा उद्धव ठाकरेंचा होईल की एकनाथ शिंदेंचा, असा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात दोन्ही बाजुंची ताकद सारखी होते. एका लायनीत आणण्याचं काम होतं. अशा परिस्थितीत निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी दोन फॅक्टर महत्त्वाचे ठरतात. आणि शिंदे-ठाकरेंमधल्या सत्तासंघर्षात याच दोन फॅक्टरचा बोलबाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? केंद्रीय निवडणूक आयोग कसं ठरवणार?

शिवसेना निवडणूक चिन्ह वाद : पहिला फॅक्टर आहे, सहानुभुतीचा

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. एवढंच नाही, तर शिंदेंनी शिवसेना पक्षावरही दावा ठोकलाय. चाळीस आमदार, १२ खासदार आणि सत्ता एकीकडे आणि एकाकी ठाकरे दुसरीकडे असं समीकरण आकारास आलाय. तसंच ठाकरेंच्या अडचणीही रोज वाढताहेत. पण याच अडचणी ठाकरेंसाठी नवसंजीवनीच काम करताना दिसत आहेत. संकटात संधी म्हणतात ना तसं.

ADVERTISEMENT

सहानुभुतीचा फॅक्टर ठाकरेंच्या बाजूने आहे. या फॅक्टरमध्ये निवडणुकीत उलथापालथ घडवून आणण्याची ताकद आहे. ठाकरेंसोबत असलेल्या याच फॅक्टरमुळे शिंदे गटामध्येही अस्वस्थता असल्याचं म्हटलं जातंय. पण सहानुभुती किती काळ राहते आणि टिकली तर तिचं मतात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जमिनीवर शिवसैनिकांचं नेटवर्क सोबत राहतं का, यावरच सगळं भवितव्य अवलंबून आहे.

बाळासाहेबांच्या नातवानेच सुप्रीम कोर्टात मांडली एकनाथ शिंदेंची बाजू, निवडणूक आयोगातही लढणार

ADVERTISEMENT

दुसरा फॅक्टर आहे, सत्तेचा. हा फॅक्टर शिंदेंसाठी काम करतोय. शिंदे गटाकडे चाळीस आमदार, १२ खासदार आहेत. तसंच मुख्यमंत्रीपदासह ९ मंत्रीपदंही आहेत. याच बळावर शिंदे गटात रोज इन्कमिंग सुरू आहे. निवडणुकीच्या राजकारणात सत्तेच्या फॅक्टरकडे हुकमी एक्का म्हणून बघितलं जातं.

सत्तेपुढं शहाणपण चालत नाही म्हणतात. पण सत्ता चालवण्याचं शहाणपण आणि ठाकरेंना असलेली सहानुभुती नियंत्रणात ठेवण्यात कसं यश मिळतं, त्यावरच शिंदे गटाचं निवडणुकीतलं भवितव्य अवलंबून आहे. सहानुभुती आणि सत्ता या दोन फॅक्टरशिवाय आणखी कुठले फॅक्टर आहेत, धनुष्यबाणाशिवाय निवडणूक झाली, तर कोण जिंकेल? हा प्रश्न त्यामुळेच औत्सुक्याचा ठरत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT