अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची का होतेय चर्चा? भाषणात दादा काय म्हणाले होते?

मुंबई तक

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. अजित पवार स्वतः दंड थोपटून या निवडणुकीत उतरलेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात काय बोलले अजित पवार?

point

धीरूभाई अंबानी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या 22 जूनला निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार दंड थोपटून उतरलेत. या निवडणुकीसाठी स्वतः अजित पवार यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रचारादरम्यान पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्स येथे आयोजित सभेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली होती.

हे ही वाचा >> गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...

अजित पवार यांनी आपल्या भाषणात धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख करत एक विधान केलं. "पंपावर पेट्रोल सोडूनच धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला" असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. "मला सहकार टीकवायचं नसतं, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? माझी गोरगरिबांची मुलं तिथं लागली ना कामाला. पंपावर काम करणं कमीपणाचं नाही असं अजित पवार पुढे म्हणाले. 

"मी जर सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खाजगी कारखाना काढायची तयारी नव्हती. सरकारने बंधनं घातली, पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाहीत." असंही पुढे अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा >> माय-लेकी दर्शनाला गेल्या, निसरड्या पायऱ्यांनी घात केला...विश्वगंगा नदीत दोघी कशा बुडाल्या?​​​​​​

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. अजित पवार यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनेल रिंगणात उतरल्याने ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp