गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...
एकाच कुटुंबातील पाच तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. दुपारी1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात काही वेळ मोठा गोंधळ उडाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हैदराबादमधून आलेल्या कुटुंबातले 5 तरूण दगावले

गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरले होते तरूण
नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून, अनेक नद्या ओसंडून वाहतयात. मात्र, यादरम्यानच अनेक दुर्घटना घडत आहेत. काल दुपारी एकीकडे पुण्याच्या मावळमध्ये घडलेल्या घटनेनं राज्याला हादरवलं. तशीच घटना दुसरीकडे नांदेडजवळ घडली. तेलंगणा राज्याच्या सीमेच्या आत असणाऱ्या प्रसिद्ध बासर येथील सरस्वती देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.
हे ही वाचा >>माथेरानच्या शॉर्लेट तलावात नवी मुंबईतील 3 जण बुडाले! 'ती' एकच चूक नडली..
बुडालेले सगळे एकाच कुटुंबातले...
हैदराबादमधील एकाच कुटुंबातील पाच तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. दुपारी1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेतलं. मृत्यू पावलेले सर्व तरुण 17 ते 18 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे.
हैदराबाद येथील दिलसुख नगर परिसरातील चिंतल बाजार येथे राहणारे एकाच कुटुंबातील 18 जण सरस्वती मातेच्या दर्शनासाठी बासर येथे आले होते. मंदिरात दर्शनापूर्वी पवित्र स्नान करण्यासाठी हे कुटुंब गोदावरी नदीतील एका बेटावर गेलं.
बोट मधोमध गेल्यावर अंघोळीला उतरले
स्थानिक बोटचालकाच्या बोटीने नदीपात्रात प्रवेश केल्यानंतर काही तरुणांनी अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पाच तरुण खोल पाण्यात अडकले आणि बुडाले. मृतांमध्ये राकेश, विनोद, मदन, रुतिक आणि भरत यांचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
हे ही वाचा >>कुंडमळ्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला..6 जणांचा मृत्यू, तर अनेक पर्यटक...
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने आरडाओरड करत मदत मागवली. बासर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कुमार, सर्कल इन्स्पेक्टर किरण रेड्डी, पोलीस अधिकारी गणेश आणि जी. गंगासागर यांच्यासह पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून सर्व पाच मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी भैंसा येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.
बासरला का होते पर्यटकांची गर्दी?
बासर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, येथील श्री सरस्वती देवीचं मंदिर भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या या गावात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गोदावरी नदीत पवित्र स्नान करणे हा दर्शनापूर्वीचा महत्त्वाचा विधी मानला जातो. मात्र, नदीच्या खोल पाण्यामुळे यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत.