"धर्मांतरासाठी आलेल्यांचा सैराट करा....", बक्षीस जाहीर करत काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
मोर्चादरम्यान बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक विधान केलं. “धर्मांतराचे प्रकार आता गावोगावी सुरू झाले आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ऋतुजाने प्राण दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून गावागावांतून या लोकांविरोधात पेटून उठले पाहिजे."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऋतुजा राजगेला न्याय द्या...सांगलीमध्ये मोर्चा

मोर्चाला भाजप आमदार पडळकरांची हजेरी

मोर्चामध्ये आक्रमक पडळकर काय म्हणाले?
सांगली : सांगली जिल्ह्यातील उच्चशिक्षित तरुणी ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर, सक्तीच्या धर्मांतराविरोधात आज संध्याकाळी सांगलीत मशाल मोर्चा काढण्यात आला. सात महिन्यांच्या गर्भवती असलेल्या ऋतुजाने सासरच्या मंडळीकडून धर्मांतरासाठी होत असलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि 'शक्ती ऋतुजा' धर्मांतरविरोधी कायदा लागू व्हावा, या मागणीसाठी हजारो सांगलीकर रस्त्यावर उतरले होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकरही या मोर्चात सहभागी होते.
हे ही वाचा >>कोकणात पाऊस घालणार धिंगाणा; तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी, आजचं हवामान वाचाच
पडळकर काय म्हणाले?
मोर्चादरम्यान बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक विधान केलं. “धर्मांतराचे प्रकार आता गावोगावी सुरू झाले आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ऋतुजाने प्राण दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून गावागावांतून या लोकांविरोधात पेटून उठले पाहिजे,” असं ते म्हणाले.
"सैराट केला तर 11 लाखांचं बक्षीस..."
पुढे पडळकरांनी बैलगाडी शर्यतीतील बक्षिसांचा दाखला देत, “जे धर्मांतर घडवणारे गावात येतात, त्यांना ठोकून काढा. तुडवले तर 1-2 लाख, कायमचे घरी बसवले तर 3 लाख आणि सैराट केला तर 11 लाखांचे बक्षीस मी वैयक्तिकरित्या देईन,” असं आक्षेपार्ह वक्तव्य पडळकरांनी केलं. या विधानाने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
हे ही वाचा >>Mumbai Weather: मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, लोकल ट्रेनवर होऊ शकतो परिणाम
मोर्चामध्ये माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी यावेळी जोर धरत होती. ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येच्या घटनेनं सांगलीसह राज्यभरात संतापाची लाट पसरली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.