‘मी फक्त पुरावे दाखवले नाही तर…’ नार्वेकरांनीही कायद्याच्याच भाषेत दिलं उत्तर
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या टीकेला उत्तर देत राहुल नार्वेकर यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत शिवसेनेच्या घटनेत त्यांनी कोणतेच बदल केले नव्हते म्हणत मी जो निर्णय दिला तो कायदेशीर आणि संविधानिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

Rahul Narvekar : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनता न्यायालय घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाची चिरफाड केली होती. ठाकरे गटाच्यावतीन अॅड. असीम सरोदेंनी (Asim Sarode) कायदेशीर बाजू मांडत न्यायालय आणि यंत्रणा कशा दबावाखाली काम करत आहेत त्याच्यावर टीका केली होती. तर त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंचे अनेक मुद्दे खोडून काढत मी जो निकाल दिला आहे तो शिवसेनेच्या (Shiv sena) 1999 च्या घटनेनुसार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निकालावर बोलताना सांगितले की, ठाकरे गटासारखं मी फक्त पुरावे दाखवले नाही तर ते वाचूनही दाखवले असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.(‘I didn’t just show the evidence I read it Rahul Narvekar replied Thackeray group)
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाची ज्यावेळेला राजकीय पक्ष कोणता हे ठरवायचा विचार केला तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जी घटना सादर केलेली असते त्याचा आधार घ्यावा असं स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आपण निर्णय दिला आहे असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाबाबत नेमकं काय म्हटले आहे त्याचाही त्यांनी दाखला दिला आहे.
हे ही वाचा >> ‘पळून गेलेले सगळे लोकशाहीद्रोही’, नार्वेकरांच्या निकालावर सरोदेंचं कायदेशीर स्पष्टीकरण
संविधानावर निकाल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाकडून केले गेलेले आरोप खोडून काढत निवडणूक आयोगाकडून जी घटना मागवण्यात आली होती. त्यानंतर 1999 ची घटना देण्यात आली होती. त्यानुसार निर्णय देण्यात आला आणि हा निर्णय संविधानाच्या आधारे दिला आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
घटना सुधारित नाही
ज्या प्रकारे ठाकरे गटाकडून टीका केली जाते त्यांच्या त्या टीकेला पुरावा काय आहे. कारण त्यांच्याकडून जी शिवसेनेचे घटना दाखवली जाते ते घटना 2018 मधील सादर केली आहे. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून नंतर ती सुधारणाच करण्यात आली नाही आणि ही बाजून निवडणूक आयोगाकडूनही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे 1999 ची जी घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, तिच घटना निवडणूक आयोगानेही ग्राह्य धरल्याचे त्यांनी सांगितेल.