‘पळून गेलेले सगळे लोकशाहीद्रोही’, नार्वेकरांच्या निकालावर सरोदेंचं कायदेशीर स्पष्टीकरण

ADVERTISEMENT

Adv Asim Sarode criticized the court and the system as being under pressure
Adv Asim Sarode criticized the court and the system as being under pressure
social share
google news

Asim Sarode : कायदा जर लोकांसाठी असेल तर तो लोकांमध्ये जाऊन बोललं पाहिजे असं मत व्यक्त करत वकील असीम सरोद यांनी शिंदे गटावर आणि विधानसभा अध्यक्षांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी देशाचे संविधान काय सांगत, सर्वोच्च न्यायालय काय म्हणते त्याचे दाखले देत आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून मुख्यमंत्री एकानाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Legislative Assembly President Rahul Narvekar) यांच्यावर कायद्याच्या भाषेत विधानसभेच्या अध्यक्षांची निकालाचे विश्लेषण केले.(Adv Asim Sarode criticized the court and the system as being under pressure )

केवळ सत्याची बाजू

आमदार अपात्रतेचा विषय ज्यावेळेपासून सुरु झाला, तेव्हापासून असीम सरोदे कायदेशीर बाजू मांडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले की, तुम्ही आमची बाजू चांगल्या पद्धतीने मांडता. त्यावर असीम सरोदेंनी सांगितले की, मी तुमची बाजू मांडत नाही तर तुम्ही संविधानाच्या बाजून आहात तेच मी मांडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकशाही कशी मारली जाते

अॅड. असीम सरोदे यांनी शिवसेनेच्या जनता न्यायालयामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचे त्यांनी विश्लेषण केले आहे. यावेळी त म्हणाले की, या आजच्या न्यायालयात केवळ सत्याची बाजू आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या कायद्याचं विश्लेषण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राहुल नार्वेकर यांच्यासारख्या व्यक्तीने निर्णय दिल्यामुळेच लोकशाही मारली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘राहुल नार्वेकरांची बायकोही ‘तो’ निर्णय…’, संजय राऊतांची तोफ धडाडली

पक्षांतर बंदी कायदा

पक्षांतर बंदी कायदा काय आहे याविषयी बोलताना त्यांनी राजीव गांधी यांनी आणलेल्या कायद्याचा दाखला दिला. पक्षांतर करताना संविधानिक नैतिकता आणण्यासाठी जो प्रयत्न झाला त्यामुळे राजकीय पक्षांवरही त्याचा दबाव राहिला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षावर विधीमंडळचा प्रभाव न राहता राजकीय पक्षाचा प्रभाव राहू शकतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे अपात्र ठरतात

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि काही आमदार गुवाहाटीला पळून गेले. त्यांच्या पळून जाण्याला मी बंडखोरी म्हणत नसल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटालाच अपात्र ठरवले. यावेळी ते म्हणाले की, राजकीय पक्षात फूट पडल्यानंतर आधी राजकीय पक्ष स्थापन केला पाहिजे, मात्र शिंदेंनी ना गट स्थापन केला ना पक्ष स्थापन केला. त्यामुळे हे पळून गेलेले आमदार हे अपात्र ठरत असल्याचे त्यांनी कायदेशीर दाखला देत सांगितले.

ADVERTISEMENT

पक्षाचा राजीनामा द्यायचा असतो

कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्तीला जेव्हा विधानसभा अध्यक्ष पद मिळते तेव्हा त्यांनी आधी नैतिक आणि प्रामाणिकपणा ठेऊन त्यांनी राजकीय पक्षाचा राजीनामा द्यायचा असतो. मात्र राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी राजीनाना दिला नव्हता. त्यामुळे त्यांचे पद हे असंविधानिक ठरत नाही का असा सवाल सरोदेंनी यावेळी केला.

ADVERTISEMENT

मॅगीसारखा निर्णय

राहुल नार्वेकर यांना पुढं करून, त्यांच्या आधारे राजकारण करणारे हे सगळे जण लोकशाहीद्रोही असल्याची टीका असीम सरोदे यांनी यांनी केली. शिंदे गटाने आमदार अपात्रतेच्या निकालावर निर्णय देताना कायद्यानुसार तो निर्णय दिला नाही. त्यामुळे त्यांनी कायदा म्हणजे मॅगीसारखा करुन ठेवला आहे. ज्या प्रमाणे मॅगी लवकर तयार केली जाते त्याप्रमाणेच त्यांनी कायद्याचा वापर केला आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

फालतू माणूस राज्यपाल

लोकशाही मार्गाने आणि लोकांच्या मतदानावर स्थापन झालेले सरकार उलथवून टाकण्यासाठी राज्यपालांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा हे अत्यंत दुःखद असल्याची खंतही असीम सरोदे यांनी व्यक्त केली. त्या काळात आणि नंतरही राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा >> Uddhav : ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, पत्रकार परिषदेत काय केला महाखुलासा?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT