Inside Story: CM फडणवीसांना तडकाफडकी बोलावलं दिल्लीला, पण या मीटिंगची आतली कहाणी भलतीच!

ऋत्विक भालेकर

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला का बोलावण्यात आलं? जाणून घ्या फडणवीसांच्या दिल्लीवारीमागची आतली कहाणी.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis, Devendra Fadnavis Delhi Visit, Fadnavis Delhi News, Amit Shah Meeting, Narendra Modi, BJP Strategy, BJP News, Union Cabinet Reshuffle, Cabinet Expansion,
Devendra Fadnavis
Google CTA

नवी दिल्ली: मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आणि त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं.

बस्स... इथूनच चर्चांना उधाण आलं. काहींनी दावा केला की, फडणवीसांची आता दिल्लीतच वर्णी लागणार तर काहींनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरू केलीय. पण या सगळ्या चर्चांमागची खरी कहाणी आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत. कारण दिल्लीत जसं दिसतं तसंच कधीच नसतं!

फडणवीसांच्या दिल्लीवारीची आतली कहाणी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून तातडीने डॅमेज कंट्रोलची रणनीती आखली जात असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याचा अर्थ फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार आहे, असा निष्कर्ष काढणं सध्या तरी घाईचं ठरेल.