फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान

मुंबई तक

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, शांत रहा, असं आवाहन केलं. सरकारवर गंभीर आरोप करत त्यांनी मुंबईला येण्याचा इशाराही दिला.

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange appeal no suicide mumbai protest warning government devendra fadnavis enkath shinde
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

जालनाः मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, असं आवाहन केलं आहे. आपण लढू, असं म्हणत त्यांनी आत्महत्या केल्यास सरकारला त्याचं काही दुःख नाही, असा आरोप केला. त्याचबरोबर कोणीही जाळपोळ किंवा रास्ता रोको करू नये, शांत राहावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“सरकारला गुडघ्यावर टेकवायचं”

मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “सरकारची मराठा विरोधी भूमिका आहे. सरकारने मराठ्यांचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे,” असा आरोप त्यांनी केला. सरकारला हतबल करायचं आणि गुडघ्यावर टेकवायचं, असं म्हणत आपण सरकारचा अन्याय मोडून काढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप