No-Confidence Motion: लोकसभेत ‘INDIA’आघाडीचा पराभव, मोदींनी नेमका कसा मिळवला विजय?

रोहित गोळे

लोकसभेत ‘INDIA’ आघाडीने आणलेला अविश्वास प्रस्ताव हा फेटाळला गेला आणि मोदी सरकारचा विजय झाला. मात्र, हा विजय नेमका कसा मिळवला हे सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

no confidence motion brought by india alliance in the lok sabha was rejected and modi government won political news headlines today
no confidence motion brought by india alliance in the lok sabha was rejected and modi government won political news headlines today
social share
google news

No-confidence motion debate: नवी दिल्ली: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर (no-confidence motion) आज (10 जुलै) जोरदार चर्चा झाली. अंतिम मतदानावेळी विरोधी पक्षाचा एकही खासदार उपस्थित नसल्याने अविश्वास प्रस्ताव संमत झाला नाही. त्यामुळे मोदी सरकारचा (Modi Govt) एकतर्फी विजय झाला. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (no confidence motion brought by india alliance in the lok sabha was rejected and modi government won political news headlines today)

गुरुवारी लोकसभेच्या कामकाजात बराच गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी आघाडी INDIA ने आणलेला अविश्वास प्रस्तावात मोदी सरकारने एकतर्फी बाजी माजली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी INDIA आघाडीला अहंकारी आघाडी असंही संबोधलं. यावरून राहुल गांधींवर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला.

हे ही वाचा>> ‘…पण यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले’, राहुल गांधींवर PM मोदींचा घणाघात

मणिपूर हिंसाचाराचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, ‘देशाने आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल.’ मंगळवारपासून अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली होती. ती आज तीन दिवसांनी संपली. .

लोकसभेत भारत आघाडीचा अविश्वास ठराव फेटाळला

पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधक बराच वेळ घोषणाबाजी करत होते. मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करावं असं ते म्हणत होते. मात्र, त्याकडे लक्ष नेते मोदींनी इतर विषयावरील आपलं भाषण सुरू ठेवलं. ज्यामुळे अखेर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतरच मोदींनी मणिपूर हिंसाचारावर आपलं मत मांडलं. त्यानंतर देखील ते इतर वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलले. तब्बल 2 तास 13 मिनिटांनंतर त्यांनी आपलं भाषण संपवलं. ज्यानंतर लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. जेव्हा सभागृहात मतदान पार पडलं तेव्हा फक्त सत्ताधारी खासदारच हजर होते. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही आणि पर्यायाने मोदी सरकारने एकप्रकारे विजय मिळवला.

हे वाचलं का?

    follow whatsapp