नीट पेपर फुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?
pm narendra modi on neet paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारने तातडीने कारवाई केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकरणातील 13 आरोपी सध्या तुरुंगात असून दोषींना कठोर शिक्षा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'नीट' पेपरफुटी हे घोर पाप; दोषींना कठोर शिक्षा होणार, पंतप्रधान मोदींचा निर्धार
नीट पेपर फुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?
pm narendra modi on neet paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारने तातडीने कारवाई केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी नीट पेपरफुटीला "घोर पाप" असल्याचे म्हटले आहे. ही बाब समोर येताच सरकारने विलंब न करता कारवाई केली असून या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणातील 13 आरोपी तुरुंगात असल्याची माहितीही त्यांनी दिली. परीक्षांची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
हेही वाचा : 'आमच्या शिष्टमंडळाला नजरकैद करण्यात आलं...' दिपकेंनी काय सांगितलं? आंदोलनाची पुढील दिशा काय?
मंत्री किरेन रिजिजू काय म्हणाले?
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर तातडीने कारवाई करून 13 आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने नीट पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ही पुनर्परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली असून निकालही नियोजित वेळेत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने वेगाने आणि ठोस पावले उचलल्याचेही रिजिजू यांनी सांगितले.
हेही वाचा : महिलेचा लोकलच्या दारात लटकून प्रवास, पण वाटेत रेल्वेच्या पुलाचा खांब आला, थरारक VIDEO










