Sambhaji Bhide: ‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का भिडेची?’, माजी मंत्री प्रचंड संतापले

रोहित गोळे

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबातत जे वादग्रस्त विधान केलं त्यावरुन आता त्यांच्यावर तुफान टीका केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर अत्यंत जहाल शब्दात टीका केली आहे.

ADVERTISEMENT

Sambhaji Bhide controversial statement on Mahatma Gandhi heavily criticized by congress leaders vijay wadettiwar
Sambhaji Bhide controversial statement on Mahatma Gandhi heavily criticized by congress leaders vijay wadettiwar
social share
google news

Sambhaji Bhide Controversial Statemenet on Mahatama Gandhi: मुंबई: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि कायमच वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी नुकतंच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. संभाजी भिडेंनी गांधीजींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) आणि यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Sambhaji Bhide controversial statement on Mahatma Gandhi heavily criticized by congress leaders vijay wadettiwar and yashomati thakur news on maharashtra politics)

‘गांधींच्या विरुद्ध बोलण्याची याची औकात आहे का?, हा आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा, हा बिनअक्कलेचा मनोहर भिड्या याने महात्मा गांधींवर अशा प्रकारची टीका करत असेल तर ते लांच्छनास्पद  आहे.’ असं म्हणत वडेट्टीवार यांनी भिडेंविरोधात संताप व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी तर भिडेंना थेट देशातूनच तडीपार करा असं म्हणत राज्य सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का या मनोहर भिडेची’

‘सगळ्यात आधी हा संभाजी नाही..  याचं संभाजी नाव याचं.. टोपणनाव आहे याचं हा मनोहर भिडे आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याचं काम हा संभाजी भिडे करतोय. महात्मा गांधींच्या विरुद्ध बोलण्याची याची औकात आहे का या मनोहर भिडेची. आईन्सटाइन म्हणतात की, महात्मा गांधी हे केवळ हाडामासाचा माणूस नव्हता, तर तो विचाराचा प्रतिक होता. ज्यांच्या विचाराने दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंत जे अहिंसक आंदोलनं झाली आणि अनेक लोकांना न्याय मिळवून दिला.’

हे वाचलं का?

    follow whatsapp