NCP : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात सुप्रिया सुळेंमुळे पेच -शिंदेंच्या नेत्याचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवार सुप्रिया सुळे आणि संजय निरुपम
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संजय निरुपम
social share
google news

Sanjay Nirupam on Sharad Pawar : भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील. यातील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे विधान शरद पवार यांनी केले. त्यांच्या या विधानावर आता संजय निरुपम यांनी टीका केली आहे. (Sanjay Nirupam On Sharad Pawar Statement about NCP merge with congress)

संजय निरुपम काय म्हणाले?

"माननीय शरद पवार हे बऱ्याच काळापासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल विचार करत आहेत. काँग्रेसने त्यांना अनेकवेळा प्रस्ताव दिला होता. पण, पेच निर्माण झाला, तो मुलीमुळे (सुप्रिया सुळे)."

"त्यांनी (शरद पवार) मुलीला (सुप्रिया सुळे) महाराष्ट्रातील काँग्रेसचं नेतृत्व सोपवण्याचा आग्रह केला होता, जो काँग्रेसने फेटाळून लावला होता. आता परिस्थिती बदलली आहे. त्यांचा पक्ष विखुरला गेला आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बारामती कोणत्या पवारांकडे जाणार? घटलेल्या टक्क्याने वाढवली चिंता

"त्यांच्या आत्ताच्या विधानाचा अर्थ हाच आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटू शकते. कदाचित तशी शंका त्यांना आहे. असं नाही झालं, तरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय त्यांच्या कोणताही पर्याय नाही."

"कारण त्यांच्या मुलीकडे जी राजकीय विचार करण्याची क्षमता आहे, ती बुडत असलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी पुरेशी नाहीये. पण, जे विलीनीकरण होईल, ते तोट्यात सुरू असलेल्या दोन कंपन्यांचे असेल. परिणाम एक मोठा शून्य", असे संजय निरूपम यांनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी काय केलं आहे विधान?

'इंडियन एक्स्प्रेस'ला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवारांनी हे विधान केले. 

ADVERTISEMENT

"पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही विचार करतील", असे विधान शरद पवार यांनी केले आहे. 

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस आणि आमच्यात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) कोणताही फरक दिसत नाही, विचारधारेबाबत. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारधारेतूनच येतो."

हेही वाचा >> 'ठाकरेंनी प्लॅनिंग केलेलं.. पण मी काय त्यासाठी थांबलो असतो का?', CM शिंदेंची मुलाखत जशीच्या तशी

"सहकाऱ्यांशी बोलण्याशिवाय मी आताच काही सांगणार नाही. मी काही बोललं नाही पाहिजे. विचारधारेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आम्ही त्यांच्या जवळ आहोत. रणनीतीबद्दल किंवा पुढील वाटचालीबद्दल कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांना स्वीकारणे कठीण आहे", असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT