'हमारी सेना ने तो ठोक दिया...', पहलगाम हल्ल्यावर बोलताना अमित शाह नेमकं काय म्हणाले?
Amit Shah: पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही महत्त्वाची माहिती दिली. मात्र, त्यावेळीच त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर विशेष चर्चा सुरू आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं. याच भाषणादरम्यान, अमित थेट म्हणाले की, 'हमारी सेना ने तो ठोक दिया...'
पाहा अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'या लोकांचं (विरोधकांचं) असं होतं की, बैसरनचे जे गुन्हेगार होते ते पाकिस्तानात पळून गेले. तेव्हा मोठ्या आवाजात विचारत होते की, पळून गेले, पळून गेले.. गृहमंत्री काय करतायेत.. त्यांनी जबाबदारी घ्यावी. आमच्या सैन्याने तर दहशतवाद्यांना ठोकलं. सीआरपीएफने ठोकलं.. आता अशावेळी मी उत्तर देणं काही गरजेचं नाही.'
'हे विचारत होते की, दहशतवादी कसे काय पळून गेले? मी यांना काही गोष्टी संक्षिप्तपणे सांगू इच्छितो. दाऊद इब्राहिम कासकर 1986 मध्ये पळून गेला तेव्हा राजीव गांधींचं सरकार होतं.'
हे ही वाचा>> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
'सय्यद सलाउद्दीन 1993 मध्ये पळून गेला तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. टायगर मेमन 1993 मध्ये पळून गेला काँग्रेसचं सरकार होतं, अनिस इब्राहिम 1993 मध्ये पळून गेला यांचं सरकार होतं.'