Nitish Kumlar : कधी RJD, कधी BJP! नितीश कुमारांच्या ‘आयाराम गयाराम’चा हा आहे इतिहास

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

When did he go with RJD, when did he coordinate with BJP... Know when Nitish Kumar changed his mind?
When did he go with RJD, when did he coordinate with BJP... Know when Nitish Kumar changed his mind?
social share
google news

Bihar Political Crisis Updates : बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला साप-शिडीचा राजकीय खेळ आता टोकाला पोहोचताना दिसत आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (JDU) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तंब झाले आहे. नितीशकुमार हे नव्या सरकारमध्येही मुख्यमंत्री असणार आहेत. बिहार भाजपने विधिमंडळ गट नेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड केली आहे. पण, या सगळ्यात महत्त्वाचा चर्चा होतेय, ती म्हणजे नितीश कुमारांची आया राम-गया राम भूमिकेबद्दल!

नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) सकाळी राजभवन गाठून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बिहारमधील बदलते राजकारण आणि पाटण्यातील वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता नितीश कुमार यांचा विचार कधी बदलला आणि ते राजदसोबत कधी गेले आणि भाजपसोबत कधी आले याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Nitish Kumar with rjd Leader tejashwi yadav
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (फाइल फोटो)

2-13 मध्ये तोडली होती भाजपसोबतची युती

आधी समता पक्ष आणि नंतर जेडीयूच्या स्थापनेपासून नितीशकुमार भाजपसोबत आहेत. 2013 मध्ये भाजपने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि याच मुद्द्यावरून नितीश कुमारांनी 1996 पासून असलेली युती तोडण्याची घोषणा केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “ओबीसींवर आक्रमण होणार…”, नारायण राणेंचा शिंदे सरकारच्या भूमिकेला विरोध

त्यावेळी 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत जेडीयू 117 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष होता. काँग्रेसचे चार आमदार, चार अपक्ष आणि सीपीआयच्या एका आमदारानेही विश्वासदर्शक ठरावावर मतदानादरम्यान नितीश कुमार सरकारच्या बाजूने मतदान केले होते.

Bihar Chief Minister Nitish Kumar With PM Narendra Modi.
नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी (फाइल फोटो)

 

ADVERTISEMENT

जेडीयूने 2014 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली आणि पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या. या अपयशाची नैतिक जबाबदारी घेत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सरकारची सूत्रे जीतनराम मांझी यांच्याकडे सोपवली. पण काही महिन्यांतच नितीश कुमार यांचे मत बदलले आणि त्यांनी राजभवन गाठले. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आणि सरकार स्थापनेचा दावा केला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले.

ADVERTISEMENT

2014 मध्ये राजदसोबत केली होती आघाडी

नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सरकारला विरोध करण्याच्या जोरावर आपला राजकीय आधार बनवला आणि 2014 मध्ये त्यांच्या पक्षासोबतच आघाडी केली. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत, JDU-RJD च्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. राजदने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन झाले.

Nitish Kumar With RJD Supremo Lalu Prasad Yadav
राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासोबत जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार. संग्रहित छायाचित्र

2017 मध्ये राजद सोडली आणि भाजपसोबत घरोबा

नितीश कुमार यांच्या आघाडी सरकारमध्ये तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री होते. तेजस्वी यादवांचे नाव भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात पुढे आले होते. यानंतर नितीश कुमार यांनी विचार बदलला. 2017 मध्ये त्यांनी राजदसोबतची आघाडी तोडली आणि भाजपसोबत घरोबा केला.

हेही वाचा >> राजकीय भूकंप! नितीश कुमारांनी दिला राजीनामा, कारणही सांगितले

जदयूने 2019 च्या लोकसभा आणि 2020 च्या बिहार विधानसभेच्या निवडणुका भाजपसोबत एकत्र लढवल्या. लोकसभा निवडणुकीत जदयूने 16 जागा जिंकल्या, पण विधानसभा निवडणुकीत पक्ष केवळ 43 जागाच जिंकू शकला.

2022 मध्ये नितीश पुन्हा राजदसोबत गेले

2022 मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपपासून दूर जात राजदसोबत आघाडी केली. नितीश कुमार यांनी राजदसोबत सरकार स्थापन केले आणि तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

नितीश कुमार यांनी भाजप आणि राजद सोबत कधी कधी केली आघाडी?

 

महाआघाडीत दुसऱ्यांदा सामील झाल्यानंतर नितीश कुमार राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याचे दिसून आले. नितीश कुमार यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरू केली आणि त्यांना कोलकाता ते दिल्ली, लखनौ ते चेन्नईपर्यंत एकत्र केले.

हेही वाचा >> अमित शाहांची भेट अन् 50 दिवसांत असं बदललं बिहारचं राजकारण, Inside Story

पाटण्यात काँग्रेससोबत आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस या पक्षांना एकत्र आणण्यातही नितीश कुमार यशस्वी झाले, पण महाआघाडीला आकार देणाऱ्या नेत्याची भूमिका काय? याबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या.

नितीश कुमार यांनी तर २०२५ ची बिहार विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा केली होती. राजदचे नेतेही नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचे चेहरा म्हणत होते, पण पंतप्रधानपदाचा उमेदवार सोडा, त्यांना इंडिया आघाडीत संयोजकपदही मिळाले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT