Vishal Patil : विशाल पाटलांचं लोकसभेत घणाघाती भाषण; म्हणाले,''17 खासदारांना तरी...''
Vishal Patil Budget Speech : भारताच्या टॅक्सचा 37 टक्के हिस्सा हा महाराष्ट्रातून येतो. भारताच्या जीडीपीचा 14 टक्के हिंसा महाराष्ट्र देतो. सरकारचं 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष आहे.पण महाराष्ट्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास होणार नाही आहे, असे विशाल पाटलांनी ठणकावून सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगलीला बजेटमध्ये निधी मिळेल अशी अपेक्षा होती
सांगली दुर राहायला महाराष्ट्राचं नाव देखील घेतलं नाही.
भारताच्या टॅक्सचा 37 टक्के हिस्सा हा महाराष्ट्रातून येतो
Vishal Patil on Budget Speech : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nimala Sitharaman) यांनी सादर केलेला बजेटवर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार विशाल पाटलांनी (Vishal Patil) बजेटवरून अर्थमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता. आम्हाला विसरा पण तुमच्या 17 खासदारांना पाहून तरी महाराष्ट्राला बजेटमध्ये काही द्यायचं, असा टोला देखील विशाल पाटलांनी निर्मला सीतारामण यांना लगावला आहे.(vishal patil criticize nirmala sitharaman on budget speech loksabha cogress maharashtra mp)
लोकसभेत बजेटच्या चर्चेवर बोलताना विशाल पाटील म्हणाले की,''सांगलीला या बजेटमधून काहीतरी मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण सांगली तर दुरच राहिला दीड तासाच्या भाषणात महाराष्ट्राचं नाव देखील घेण्यात आलं नाही, अशी खंत विशाल पाटलांनी व्यक्ती केली.
आसाम आणि बिहारमध्ये आलेल्या पुरावर चर्चा झाली. पण महाराष्ट्रात होणाऱ्य पुराच्या नुकसानीवर अर्थमंत्र्या बोलल्या देखील नाही, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.तसेच आंध्रप्रदेशच्या अमरावतीला हजार कोटीचा निधी देण्यात आला.पण महाराष्ट्रात देखील एक अमरावती येते त्याचा उल्लेखच केला नाही,अशी टीका विशाल पाटलांनी सीतारामण यांच्यावर केली.
हे ही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या जागेवर भाजपचा दावा, मावळमध्ये नवा तिढा
विशाल पाटील पुढे म्हणाले की, ''बिहारच्या सिंचन योजनेसाठी एबीपी आणि पीफकेएसवायसे निधी देण्याबदद्ल बोललं गेलं. पण सांगलीत विस्तारीत म्हैसाळ, विस्तारीत टेंभू प्रकल्पासाठी एबीपीमधून निधी देण्याची गरज वाटली नाही,असा हल्लाही त्यांनी अर्थमंत्र्यांवर चढवला.










