ठाकरे सरकारने इंधनाचे फक्त दर दीड-दोन रूपये कमी करून जनतेची थट्टा केली-फडणवीस

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक ठाकरे सरकारनेही आज इंधनावरचे दर कमी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरच्या व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ ठाकरे सरकारनेही हा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्र सरकारने जनतेची थट्टा केली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले देवेंद्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

ठाकरे सरकारनेही आज इंधनावरचे दर कमी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरच्या व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ ठाकरे सरकारनेही हा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्र सरकारने जनतेची थट्टा केली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली आहे. इंधनाचे दर दीड आणि दोन रूपये कमी करणं ही थट्टाच आहे. आपण जर नीट पाहिलं तर लक्षात येतं की देशात इतर राज्यांनी आत्तापर्यंत ७ रूपये ते १५ रूपयांपर्यंत दर कमी केला आहे. महाराष्ट्र हे देशातलं सर्वात समृद्ध राज्य आहे. देशाच्या जीडीपीच्या १५ टक्के जीडीपी एकट्या महाराष्ट्राचा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp