‘मोदी निवडणूक जिंकून देणारे यंत्रमानव’; काश्मीरप्रश्नी आरसा दाखवत ठाकरेंचा ‘सामना’तून सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये झालेल्या सभेत काश्मीर प्रश्नावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. मोदींच्या भाषणातील याच मुद्द्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ अग्रलेखातून टीका सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. सामना अग्रलेखातून मोदींचं कौतुक करताना चिमटेही काढण्यात आलेत. अग्रलेखात म्हटलंय, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये झालेल्या सभेत काश्मीर प्रश्नावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. मोदींच्या भाषणातील याच मुद्द्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ अग्रलेखातून टीका सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
सामना अग्रलेखातून मोदींचं कौतुक करताना चिमटेही काढण्यात आलेत. अग्रलेखात म्हटलंय, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे”, अशी टीका ठाकरेंकडून करण्यात आलीये.
काश्मीर प्रश्नावरून सामनातून मोदींना सवाल करण्यात आलेत. “पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादेत आणखी एक जळजळीत विधान केले ते कश्मीरविषयी. आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील अनेक वेगवेगळी संस्थाने विविध राज्यांमध्ये विलीन केली. देश एकसंध केला, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ कश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही. कश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज आपण सरदारांनी दाखवलेल्या मार्गानेच जात आहोत.’ मोदी यांनी हे अत्यंत परखड व जळजळीत भाष्य केलं.”
“मोदी कश्मीर व नेहरूंबाबत हे भाषण करत असताना तिकडे कश्मीरात काय सुरू होते? 10 ऑक्टोबरला सकाळपासूनच कश्मिरी पंडित आपल्या सुरक्षेसाठी श्रीनगर व इतरत्र रस्त्यांवर उतरले होते. कश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी पंडित रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश करीत होते. आंदोलन करीत होते. आमचे संरक्षण करा. आम्हाला सुरक्षित स्थळी हलवा, अशा किंकाळ्या फोडत होते. हे चित्र धक्कादायक तितकेच मन विषण्ण करणारे आहे”, अशी चिंता व्यक्त करताना मोदींना खडेबोल सुनावले आहेत.