Uddhav Thackeray : “…मग आम्हाला अपात्र का केलं नाही?”, ठाकरेंचा नार्वेकरांना संतप्त सवाल

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

He said that the Speaker has not followed the orders of the Supreme Court. This could be contempt, we will investigate. The Supreme Court should take suo motu cognizance of the matter.
He said that the Speaker has not followed the orders of the Supreme Court. This could be contempt, we will investigate. The Supreme Court should take suo motu cognizance of the matter.
social share
google news

Uddhav Thackeray Mla Disqualification case Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. नार्वेकरांनी ठाकरेंना शिंदेंना हटवण्याचे अधिकारच नाही, असे स्पष्ट करताना १६ आमदारांविरोधातील याचिका फेटाळली. त्याचबरोबर सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली. नार्वेकरांनी दिलेल्या या निकालानंतर उद्धव ठाकरेंना संताप अनावर झाला. (Uddhav Thackeray claims that rahul narvekar not followed direction of supreme court)

निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरेंनी निकालावर भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या पद्धतीने लवाद म्हणून नार्वकरांना बसवले, त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की याची मिलीभगत झालेलं आहे. लोकशाहीचा खून करण्यासाठी याचं काही कटकारस्थान चालेलं आहे का? असे मी म्हणालो होतो. आजच्या निकालामुळे एक गोष्ट प्रश्नांकित झाली आहे, ती म्हणजे पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं, पक्षांतराचा राजमार्ग कसा असला पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नाही, हेच दिसून आलं”

“त्यांनी स्वतः दोन-तीन पक्ष बदलले आहेत. त्याच्यामुळे भावी वाटचालीतील अडथळा दूर करून घेतला असेल, मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आहोत की, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च असतात, ते परिमाण ठरलेलं असतं. अनिल परब यांनी न्यायालयाने काय निर्देश दिले हे सांगितलं होतं. ते संपूर्णपणे पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाही जुमानत नाही, हे त्यांच्या आजच्या निकालातून दिसून आलं आहे”, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> ‘Shiv Sena ही शिंदेंचीच, व्हीपही..’, नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निकाल

“महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाहीये. मूळ प्रकरण अपात्रतेचं आहे. आमची घटना जर ग्राह्य धरत नसाल, तर तुम्ही आम्हाला अपात्र का केलं नाही? शिवसेना कुणाची हा निर्णय दिला. शिवसेना कुणाची हे लहान मुलंही सांगू शकते. निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यालाच त्यांनी ग्राह्य धरलं आहे. निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे. त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे”, अशी संतप्त टीका ठाकरेंनी नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर केली.

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? -ठाकरे

“महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो की, देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवली आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावे. कोणत्याही प्रकरणात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याआधी जे निकाल दिलेले असतात, ते मानले जातात. या प्रकरणात हा निर्णय मानला जाणार आहे का? की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मानला जायला पाहिजे, हा प्रश्न आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> CM शिंदेंविरोधात निकाल गेला तर.. असं बदलेल महाराष्ट्राचं राजकारण

“२०१८ मध्ये तुमची झालेली नियुक्तीच अवैध आहे, असे अध्यक्षांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे म्हणाले, “तो तुमचा अधिकारच नाही. २०१८ ला केलेली नियुक्ती मान्य नाहीये, पण कोर्टाने त्यांना ते सांगितलंच नव्हतं. कोर्टाने आमचा व्हीप मान्य केला होता. कोर्टाने गटनेता मानला होता. सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टी न बघता केल्या का? 2018 ची घटना मान्य नाही, मग आता जे गद्दार निवडून आले आहेत, ते कोणत्या आधारावर निवडून आले आहेत. कोणत्या चिन्हावर निवडून आले होते?”, असा संतप्त सवाल ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांना केला.

“सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, या दिवशी हा व्हीप होता आणि हा गटनेता होता. आता यापुढचं तुम्ही बघा. त्या तारखेला काय होतं? ते सोडून ते नको त्यात घुसले. वेळकाढूपणा केला. त्यांचा हेतू स्वच्छ होता की, वेळकाढूपणा करण्याचा. त्यांचं नाटक होतं. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. माझी सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, निवडणुकीआधी दूध का दूध, पानी का पानी व्हायला हवं”, असे भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.

हेही वाचा >> “वही होता है जो मंजूरे खुदा ए नरेंद्र मोदी और अमित शाह होता है”

“यांना निवडणूक काढायची आहे. यांना असं वाटलं की, जनता, मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून शिवसेना संपवू, पण शिवसेना संपत नाहीये. मिंधेची शिवसेना महाराष्ट्र आणि देशातील जनता मानणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने यांचा आदर म्हणून त्यांच्याकडे हे प्रकरण दिलं होतं. पण, सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता, काही तरी प्रक्रिया त्यांनी केली आणि कायद्याचा अनर्थ लावून त्यांनी तो निकाल दिला. हा निकाल सर्वोच्च नाही. हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. जनतेच्या मनात तर हा अजिबातच टिकणार नाही”, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT