टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे असं का म्हणाले उद्धव ठाकरे? दसरा मेळाव्याबाबतही केलं मोठं वक्तव्य
मुंबई: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन आणि भाजपच्या मदतीने ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीचं आवाहन करत आहेत. शिवसेनेकडून वाहतूक सेनेच्या नवीन सदस्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून 11 हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रं […]
ADVERTISEMENT

मुंबई: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन आणि भाजपच्या मदतीने ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीचं आवाहन करत आहेत. शिवसेनेकडून वाहतूक सेनेच्या नवीन सदस्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून 11 हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रं जमा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले?
नवीन सदस्यांचे सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी ते म्हणाले ”मला हे सर्व शपथपत्र घेऊन जाण्यासाठी पुन्हा याच वाहतूक सेनेची गरज पडली पाहिजे एवढी शपथपत्र जमा करा”.
बाकी जे काही बोलायचं आहे, ते दसरा मेळाव्यात बोलणारच- उद्धव ठाकरे
“सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.