दुकानात PM मोदींचा फोटो का नाही? निर्मला सीतारमन जिल्हाधिकारी पाटील यांच्यावर भडकल्या!

मुंबई तक

जहिराबाद : स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही? असा सवाल करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन जिल्हाधिकारी जितेश पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तसेच स्वस्त धान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात राज्याचा वाटा किती रुपये असतो अन् केंद्राचा वाटा किती रुपये असतो? या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यानेही त्यांनी पाटील यांना झापले. निर्मला सीतारामन मागील दोन दिवसांपासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जहिराबाद : स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही? असा सवाल करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन जिल्हाधिकारी जितेश पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तसेच स्वस्त धान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात राज्याचा वाटा किती रुपये असतो अन् केंद्राचा वाटा किती रुपये असतो? या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यानेही त्यांनी पाटील यांना झापले.

निर्मला सीतारामन मागील दोन दिवसांपासून तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्या भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा प्रवास योजना’ या योजनेंतर्गत जहिराबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या होत्या. या दौऱ्यात काही सरकारी योजनांचाही आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी त्या बिकरुर या ठिकाणी पोहचल्या. जिल्हाधिकारी जितेश पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते.

राज्यपालांनी घेतली CM शिंदेंच्या पत्राची दखल : ‘मविआ’ची 12 आमदारांची यादी अखेर रद्द

निर्मला सीतारामन यांना एका स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही. त्यावरुन त्यांनी जिल्हाधिकारी पाटील यांना काही प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, गरिबांना त्यांच्या राज्यात स्वस्त दरात 1 किलो तांदुळ उपलब्ध करुन देण्यात केंद्र सरकारचा सिंहाचा वाटा असतो. त्याच दर्जाचा तांदुळ खुल्या बाजारात 35 रुपये किलो दराने मिळतो. यात राज्य सरकराचा वाटा किती असतो? असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकारी जितेश पाटील यांना विचारला.

हे वाचलं का?

    follow whatsapp