‘आम्ही काय राहुल गांधींच्या तोंडात जाऊन बसलो होतो?’, प्रश्न विचारताच रावसाहेब दानवेंचा चढला पारा

मुंबई तक

सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून भाजपकडून काँग्रेस नेते राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राहुल गांधींवर टीका केलीये. याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या नेहरूंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या इतिहासाबद्दलच्या विधानावरून रावसाहेब दानवेंनी सेना नेत्यांना सुनावलं. भाजपने सावरकरांचा मुद्दा घडवून आणल्याची चर्चा सुरू आहे, असं पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारलं. त्यावर केंद्रीय मंत्री दानवे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून भाजपकडून काँग्रेस नेते राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राहुल गांधींवर टीका केलीये. याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या नेहरूंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या इतिहासाबद्दलच्या विधानावरून रावसाहेब दानवेंनी सेना नेत्यांना सुनावलं.

भाजपने सावरकरांचा मुद्दा घडवून आणल्याची चर्चा सुरू आहे, असं पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारलं. त्यावर केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, “आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? आम्ही मुद्दा घडवून आणला… ज्याला वाचन नाही. ज्याला या देशातील महापुरुषांबद्दल कल्पना नाही, त्यांच्या तोडून निघालेले हे शब्द आहेत.आम्ही कशाला सावरकरांचा मुद्दा आणावा?”, असं उत्तर दानवेंनी दिलं.

“सावरकर तर आमच्या तोंडात आहेत. सावरकर आमच्या आचरणात आहेत. सावरकर आमच्या विचारात आहेत, हे आम्ही नाकारत नाही. आणि हे आम्ही घडवून आणलं नाही. आम्ही तर त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. यावर आम्हाला गर्व आहे. आम्ही काही कोणापुढे ते झाकत नाही”, अशी भूमिका रावसाहेब दानवेंनी मांडली.

शरद पोंक्षेंचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, “वीर सावरकर राहिले त्या तुरुंगात एक दिवस राहून दाखवा”

हे वाचलं का?

    follow whatsapp