Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

मुंबई तक

What is history of Shiv sena alliances: मुंबई: मुंबईत जन्म झालेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं राजकारण नेहमीच आक्रमक राहीलं आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना करताना मराठी भूमिपूत्रांचा विषय हाती घेत दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) आपल्या राजकारणाला (Politics) सुरुवात केलेली. तेव्हापासून हा पक्ष रस्त्यावर उतरून थेट भिडणारा असाच होता. मात्र, असं असलं तरीही शिवसेनेने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

What is history of Shiv sena alliances: मुंबई: मुंबईत जन्म झालेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं राजकारण नेहमीच आक्रमक राहीलं आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना करताना मराठी भूमिपूत्रांचा विषय हाती घेत दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) आपल्या राजकारणाला (Politics) सुरुवात केलेली. तेव्हापासून हा पक्ष रस्त्यावर उतरून थेट भिडणारा असाच होता. मात्र, असं असलं तरीही शिवसेनेने केवळ या एकाच गोष्टीच्या जीवावर आपल्या राजकारणाला दिशा दिली नाही. तर त्यांनी बेरजेच्या राजकारणातही वेळोवेळी बाजी मारली. ज्यासाठी बाळासाहेब आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या युती आणि आघाडी (Alliance) करत नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला आहे. (what is history of shivsena alliances how has it always used shock tactics in politics)

खरं तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी आजवर अनेकदा अनाकलनीय अशा स्वरुपाचंच राजकारण केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेषत: आघाडी आणि युतीच्या बाबतीत. शिवसेनेच्या या दोन्ही सर्वोच्च नेत्यांनी अनेकदा महाराष्ट्रालाही बुचकळ्यात टाकणाऱ्या राजकीय चाली खेळल्या आहेत. ज्यामुळे त्यांनी वेळोवेळी शिवसेनेचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.

असं म्हणतात की, राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो… याचं नेमकं उदाहरण हे आपल्याला शिवसेनेच्या युती-आघाडीच्या राजकारणातून पाहायला मिळतं. ज्या पक्षाला कधी काळी शिवसेनेनं शिव्यांची लाखोली वाहिली त्याच पक्षांसोबत त्यांनी युतीही केल्याचं आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच शिवसेनेनं आजवर कधी आणि कोणत्या पक्षांशी युती किंवा आघाडी केली हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बाळासाहेब ठाकरे : कागद संपून जाईल पण बाळासाहेबांच्या आठवणी संपणार नाहीत!

हे वाचलं का?

    follow whatsapp