भारतीय क्रिकेटपटूंचं होणार Increament, BCCI कडून मॅच फी मध्ये वाढ

मुंबई तक

कोरोनामुळे भारतात स्थानिक क्रिकेटला मोठा फटका बसला होता. २०२० मध्ये बीसीसीआयने याच कारणामुळे घरगुती क्रिकेट सामन्यांसह आंतरराष्ट्रीय सामनेही भरवले नाहीत. २०२१ पासून बीसीसीआयने मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटला सुरुवात केली. परंतू या काळात क्रिकेट सामने बंद असल्यामुळे ज्या खेळाडूंचं आर्थिक नुकसान झालं त्यांना बीसीसीआयने आता दिलासा दिला आहे. स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनामुळे भारतात स्थानिक क्रिकेटला मोठा फटका बसला होता. २०२० मध्ये बीसीसीआयने याच कारणामुळे घरगुती क्रिकेट सामन्यांसह आंतरराष्ट्रीय सामनेही भरवले नाहीत. २०२१ पासून बीसीसीआयने मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटला सुरुवात केली. परंतू या काळात क्रिकेट सामने बंद असल्यामुळे ज्या खेळाडूंचं आर्थिक नुकसान झालं त्यांना बीसीसीआयने आता दिलासा दिला आहे.

स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून खेळाडूंचं प्रलंबित राहिलेलं मानधनही बीसीसीआय देणार आहे. BCCI च्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक आज पार पडली ज्यात आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

१) २०२०-२१ च्या हंगामात रणजी ट्रॉफी आणि महिलांच्या टी-२० स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना मोबदला दिला जाणार आहे. याचसोबत २०१९-२० बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट हंगामात सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंना कोविड -१९ परिस्थितीमुळे गमावलेल्या २०२०-२१ च्या हंगामाची भरपाई म्हणून 50 टक्के मॅच फी मिळणार आहे.

याव्यतिरीक्त बीसीसीआयने खेळाडूंच्या मॅच फीमध्येही वाढ केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp