ICC भारताला सपोर्ट करत आहे का? शाहिद आफ्रिदीला बीसीसीआय अध्यक्षांनी दिले सडेतोड उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Team India T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात T20 World Cup 2022 खेळत आहे. त्याचवेळी संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय संघाला आता फक्त एका विजयाची गरज आहे. त्यांच्या गटात भारतीय संघाने पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या संघांना पराभूत केले आहे. या दोन्ही विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय संघावर जोरदार टीका केली आणि अनेक आरोपही केले. विशेषत: पावसाने ग्रासलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केल्याने त्यावर अधिकच टीका होत आहे.

भारत-बांगलादेश सामन्यानंतर सर्वाधिक टीका झाली. मैदान ओले होते, त्यावरच सामना झाला, असे पाकिस्तानी समर्थक सांगत आहेत. भारतीय संघाने एकप्रकारे उपांत्य फेरी गाठावी अशी आयसीसीची इच्छा आहे. आयसीसी भारताकडे अधिक झुकत आहे. असे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) भारतीय संघाला पाठिंबा देत बाकीच्यांसोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला.

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सडेतोड उत्तर दिले

पाकिस्तानी वाहिन्यांवर असे बोलले जात आहे की आयसीसीला टीम इंडियाने एक प्रकारे सेमीफायनलमध्ये पोहोचावे असे वाटते. मात्र या सर्व आरोपांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की आयसीसी आम्हाला का पाठिंबा देईल? ICCपासून इतर संघांपेक्षा आम्हाला काय वेगळे मिळतं? रॉजर बिन्नी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ‘हे योग्य नाही. आयसीसी आमची बाजू घेते यावर माझा विश्वास नाही. सर्वांना समान वागणूक दिली जाते. आपण जसे बोलत आहात असे काहीही नाही. भारत हे क्रिकेट विश्वातील एक मोठे शक्तीस्थान आहे, परंतु आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते आफ्रिदी आणि पाकिस्तानी टीव्ही अँकर?

पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीवरील एका पत्रकाराने सांगितले की, ‘शाकिब अल हसन हेच ​​बोलत होते. आणि ते स्क्रीनवरही दाखवले होते. तुम्ही जमीन पाहिली… ती ओली होती. पण मला वाटते की आयसीसीचा कल कितीही असला तरी तो केवळ एक प्रकारे भारताला उपांत्य फेरीत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या पॅनलमध्ये शाहिद आफ्रिदीचाही समावेश होता. तो म्हणाला, ‘हा सामना चांगला आणि रोमांचक होता. मला वाटतं एवढा पाऊस पडला, त्यानंतर लगेचच मॅच सुरू झाली. अर्थात आयसीसी… आणि मग भारत खेळत आहे. त्यात दबाव असतो. त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. पण बांगलादेशने चांगले क्रिकेट खेळले, असं आफ्रिदी म्हणाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT