“विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला पूजणं बंद करा”; गौतम गंभीर असं का म्हणाला?
भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक गौैतम गंभीर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील हिरो संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गौतम म्हणतो की, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्टार खेळाडूंची पूजा करणं बंद करावं, अन्यथा क्रिकेटचं भलं होणार नाही. गौतम गंभीरने एका मुलाखतीत सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये कोणताही राक्षस तयार करू नका, फक्त भारतीय क्रिकेटलाच खरा राक्षस होऊ द्या. […]
ADVERTISEMENT

भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक गौैतम गंभीर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील हिरो संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गौतम म्हणतो की, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्टार खेळाडूंची पूजा करणं बंद करावं, अन्यथा क्रिकेटचं भलं होणार नाही. गौतम गंभीरने एका मुलाखतीत सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये कोणताही राक्षस तयार करू नका, फक्त भारतीय क्रिकेटलाच खरा राक्षस होऊ द्या.
‘आधी महेंद्रसिंह धोनी आणि आता कोहली’
गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा तुम्ही एखाद्याची पूजा करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यासोबत उपस्थित असलेले अनेक खेळाडू तिथेच संपतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. आधी महेंद्रसिंग धोनी होता आणि आता विराट कोहली आहे. गौतम म्हणाला की, जेव्हा विराट कोहलीने टी-20 सामन्यात शतक झळकावले तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या शानदार स्पेलबद्दल कोणीही त्याच्याबद्दल बोललं नाही. फक्त विराट कोहलीने केलेल्या शतकाचीच चर्चा जास्त होती, असं गंभीर म्हणाला.
‘या सगळ्याला सोशल मीडिया जबाबदार’ : गंभीर
पुढे बोलताना त्याने सांगितले की, कॉमेंट्रीमध्ये मी एकटाच होतो ज्याने चार षटकात 4 धावा देऊन 5 विकेट्स घेणे सोपे नाही हे वारंवार नमूद केले. भारताला हिरोंची पूजा यातून बाहेर यावं लागेल. तुम्हाला फक्त भारतीय क्रिकेटला मोठं समजावं लागेल. ही संस्कृती कशी सुरू झाली असा प्रश्न विचारला असता गौतम गंभीरने सोशल मीडियाला कारणीभूत मानलं.