IPL 2023 Final CSK vs GT : आजही सामना झाला नाही, विजेता कोण? जाणून घ्या समीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

In the final of IPL 2023 (IPL 2023 Final CSK vs GT), if it rains on the reserve day May 29 also, then who will get the trophy in Chennai and Gujarat?
In the final of IPL 2023 (IPL 2023 Final CSK vs GT), if it rains on the reserve day May 29 also, then who will get the trophy in Chennai and Gujarat?
social share
google news

आयपीएल 2023 ची फायनल (IPL 2023 Final, CSK vs GT) 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नियोजित वेळापत्रकानुसार खेळवली जाणार होती. मात्र पावसामुळे 28 मे रोजी सामना झालाच नाही आणि हा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तरीही सामन्यावरील पावसाचे सावट कायम आहे. 29 मे रोजी म्हणजेच राखीव दिवशीही पाऊस होण्याची शक्यता आहे. राखीव दिवशीही सामना झाला नाही, तर चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघापैकी कुणाला विजेता म्हणून घोषित केले जाईल. त्याबद्दलचा नियमही समोर आला आहे.

29 मे रोजी हवामान कसे असेल?

प्रथम हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 29 मे रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता 21 टक्के आहे. यादरम्यान, जेव्हा सामना होईल तेव्हा काळे ढग दाटून राहतील. दुपारनंतर अहमदाबादमध्ये आकाशात ढगांची गर्दी वाढेल. आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे 28 मे रोजी फायनलच्या दिवशी हवामान स्वच्छ घोषित केले होते. मात्र असे असतानाही अचानक वातावरण बिघडले आणि अंतिम सामना होऊ शकला नाही.

हेही वाचा >> IPLच्या विजेत्या, उपविजेत्या संघावर बक्षिसांची लयलूट! किती Prize Money मिळणार?

राखीव दिवशी काय होईल?

28 मे प्रमाणेच राखीव दिवशीही पावसामुळे 120 मिनिटे जादा वेळ घेण्यात येणार आहे. तीन तास 20 मिनिटांव्यतिरिक्त राखीव दिवशी दोन तासांचा अतिरिक्त वेळ घेण्यात आला आहे. जेणेकरून सामना कोणत्याही परिस्थितीत होऊ शकेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

षटके कशी आणि कधी कमी होतील?

समजा राखीव दिवशीही पाऊस पडला. त्यामुळे 5-5 षटकांचा सामनाही होऊ शकत नाही. त्यानंतर शेवटची स्थिती म्हणजेच एक षटकांच्या सामन्यासाठी शेवटची वेळ मर्यादा 1:20 ठेवण्यात आली आहे. या वेळेपर्यंत मैदान तयार झाल्यास सुपर ओव्हरने सामन्याचा निर्णय होईल. 5-5 षटकांची अंतिम वेळ मर्यादा 12.6 मिनिटे आहे. 20-20 षटकांच्या सामन्यासाठी शेवटची वेळ मर्यादा 9:36 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

हेही वाचा >> Mangesh Chavan : “एकनाथ खडसे म्हणजे विकृती, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पनवती”

अंतिम सामना रद्द झाल्यास काय?

अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर राखीव दिवशीही पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. या प्रकरणात, स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील 70 सामन्यांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जाईल. त्यामुळे गुजरातचा संघ चॅम्पियन होऊ शकतो. कारण त्याने साखळी टप्प्यातील 14 पैकी 10 सामने जिंकले. तर चेन्नई संघाने 8 सामने जिंकले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT