जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण…England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

मुंबई तक

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला १० ते १४ सप्टेंबर दरम्यानचा ओल्ड ट्रॅफर्ड येथील अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा सामना खेळण्यासाठी नकार दर्शवला. मालिकेत सध्या टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. परंतू अखेरच्या कसोटी सामन्याचा निकाल काय यावरुन बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात वाद सुरु असल्यामुळे निकाल प्रलंबित ठेवण्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला १० ते १४ सप्टेंबर दरम्यानचा ओल्ड ट्रॅफर्ड येथील अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा सामना खेळण्यासाठी नकार दर्शवला. मालिकेत सध्या टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. परंतू अखेरच्या कसोटी सामन्याचा निकाल काय यावरुन बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात वाद सुरु असल्यामुळे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलाय.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या प्रकरणी महत्वाचं वक्तव्य केलंय.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणात आयसीसीच्या तंटा निवारस समितीला पत्र लिहून निर्णय देण्याची आणि मध्यस्थीची मागणी केली आहे. ज्यावर आयसीसीने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. परंतू कोणत्याही परिस्थितीत अखेरचा कसोटी सामना हा मालिकेचाच भाग असेल या भूमिकेवरुन मागे हटण्यास बीसीसीआय तयार नाहीये.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अखेरचा कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्याची तयारी दाखवून तो या मालिकेचा भाग नसेल अशी अट घातली होती. ज्याला गांगुलीने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. “आमची इच्छा आहे की ही मालिका पूर्ण व्हावी. २००७ नंतर इंग्लंडमध्ये हा आमचा पहिलाच मालिका विजय असेल. अखेरच्या कसोटी सामन्यातबाबत कोणतीही तडजोड होऊ नये हे आमचं मत आहे. पुढील वर्षात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल तेव्हा जादा टी-२० आणि वन-डे सामना खेळण्याची आमची तयारी आहे. परंतू यानंतर जो कसोटी सामना खेळवला जाईल तो मालिकेतला पाचवा कसोटी सामना असावा हे आमचं मत आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp