Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये आज म्हणजेच 12 जून रोजी एक भीषण विमान अपघात झाल्याचं समोर आलं आहे. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांतच कोसळले. या अपघातग्रस्त विमानात 242 लोक होते आणि यात 230 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट होते.
ADVERTISEMENT
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांच्यासह 168 जणांचा समावेश आहे. घटनेनंतर लगेचच बचाव कार्य सुरू झाले. यादरम्यान, AI-171 एअर इंडियाचं विमान चालवणारे ते दोन पायलट्स कोण होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फ्लाइटचे पायलट्स नेमके कोण?
या विमानात कॅप्टन सुमित सभरवाल आणि क्लाईव्ह कुंदर असे दोन पायलट्स होते. या विमानाची कमांड कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे होती आणि क्लाईव्ह कुंदर हे या उड्डाणाचे फर्स्ट ऑफिसर म्हणजेच पहिले अधिकारी होते.
कोण आहेत कॅप्टन सुमीत सभरवाल?
कॅप्टन सुमित सभरवाल हे एक अनुभवी पायलट आहेत. त्यांना एलटीसी (लायसन्स टू कमांड) अंतर्गत 200 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. ते या फ्लाइटचे मुख्य पायलट होते.
कोण आहेत क्लाइव्ह कुंदर?
क्लाइव्ह कुंदर हे विमानाचे फर्स्ट ऑफिसर होते. त्यांच्याकडे एकूण 11 तासांचा फ्लाइटचा अनुभव होता. या विमानात ते एक ट्रेनी म्हणजेच जूनियर पायलटच्या भूमिकेत तैनात होते.
हे ही वाचा: Ahmedabad Air India Crash: अपघात झालेल्या विमानातील संपूर्ण प्रवाशांची यादी जशीच्या तशी...
विमानात फर्स्ट ऑफिसर कोण असतो?
फ्लाइट ऑपरेशन्स दरम्यान सहसा दोन पायलट असतात, एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर. कॅप्टन हा विमानाचा मुख्य पायलट असतो, तर फर्स्ट ऑफिसर त्याला सह-पायलट म्हणजेच सहकारी म्हणून मदत करतो. फर्स्ट ऑफिसरला सहसा कमी अनुभव असतो आणि साधारण पाच वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्याला कॅप्टन पदावर प्रमोशन मिळू शकतं.
हे ही वाचा: वैमानिकाला अंदाज आला आणि MAYDAY मेसेज नियंत्रण कक्षाला दिला, घटनेचं कारण कळलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या रनवे- 23 वरून दुपारी 1:38 वाजता (0809 UTC) उड्डाण केले. उड्डाणानंतर काही मिनिटांनी पायलटने एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ला 'मेडे कॉल' पाठवला, जो आपत्कालीन परिस्थिती दाखवतो. मात्र त्यानंतर, विमानाने एटीसीकडून आलेल्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले नाही.
रनवे- 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान एअरपोर्टच्या हद्दीतून बाहेर पडलं आणि काही मिनिटांतंच जमिनीवर कोसळं. अपघातानंतर घटनास्थळावरून काळा धूर निघताना दिसला, यामुळे संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण झालं आहे.
ADVERTISEMENT
