विराट कोहलीला अटक होणार? बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे #ArrestKohli ट्रेंडला उधाण!

Virat Kohli Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

Mumbai Tak

मुंबई तक

06 Jun 2025 (अपडेटेड: 06 Jun 2025, 08:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरसीबीच्या विक्ट्री परेडच्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू

point

विराट कोहलीला अटक करा...सोशल मीडियावर ट्रेंड सुरु

point

त्या दिवशी बंगळुरुच्या मैदानात नेमकं काय घडलं?

Virat Kohli Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. आरसीबीने 18 वर्षांनी आयपीएलचा किताब जिंकला. 17 वर्षांपासून सुरु असलेलं पराभवाचं सावट संपल्यानंतर संपूर्ण क्रिडाविश्वातून संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अशातच बंगळुरुत आरसीबीच्या विक्ट्री परेडचं आयोजन करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

आरसीबीच्या विक्ट्री परेडमध्ये 11 जणांचा मृत्यू अन्...

पण या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला. आरसीबीची विक्ट्री परेड बंगळुरुच्या विधानसभेतून सुरु झाली आणि चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत नेण्यात आली. या विजयी रॅलीत सहभाग घेण्यासाठी आरसीबीचे लाखो चाहते बंगळुरुच्या रस्त्यावर उतरले होते. पण याचदरम्यान, लोकांनी गर्दी उसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आणि 67 जण जखमी झाले. इतकी गंभीर घटना घडली, तरीही स्टेडियममध्ये विजयी जल्लोष सुरुच होता. यादरम्यान, विराट कोहली आणि आरसीबीचा कर्णधारही स्टेडियममध्ये उपस्थित होता. 

हे ही वाचा >> ShivSena UBT-MNS: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल', उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!

आरसीबीच्या विक्ट्री परेडमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याने, प्रशासनाने कठोर कारवाई केली. अनेक पोलिसांना निलंबित केलं. तसच आरसीबी विक्ट्री परेडचं आयोजन करणारे आणि डीएनए एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं. या कारवाई दरम्यान आता सोशल मीडियावर विराट कोहलीली अटक करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #ArrestKohli असा ट्रेंड सुरु झाला. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कोहलीवर टीका केली आहे.
इंटरनेटवर यूजर्सने म्हटलं आहे की, कोहलीसह आरसीबीच्या खेळाडूंना या गंभीर घटनेसाठी जबाबदार धरलं पाहिजे. विराटला लंडन जाण्याची इतकी घाई का होती, असाही सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पीडित कुटुंबियांचं सांत्वन करण्याऐवजी विराट कोहली लंडनला निघून गेला, हे योग्य नाही..असंही काही नेटकरी म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> आईनेच 17 वर्षाच्या लेकीला संपवलं! मावस, चुलत भावांनी साथ दिली, प्रेमाचा दी एंड कसा झाला?

    follow whatsapp