बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यातील हिरूर गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. या घटनेने संपूर्ण परिसर एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पण त्याच्या अटकेनंतर त्याने पोलिसांना पत्नीच्या हत्येचं जे कारण सांगितलं त्यावरून पोलीस हादरून गेले आहेत.
ADVERTISEMENT
'त्या' नाजूक गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये भांडण आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वी देखील अनेकदा भांडणं व्हायची. पण यावेळी भांडण इतकं वाढले की, पतीने टोकाचं पाऊल उचलत थेट पत्नीची हत्याच केली. पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता, त्यामुळे संतापलेल्या पतीने तिची हत्या केली. ही घटना 25 मे रोजीची असल्याचे समजतं आहे.
हे ही वाचा>> सैराट.. आईने पोटच्या पोरीचं मुंडकं छाटलं, भावांनी धड केलं वेगळं अन्..
ऊसाच्या शेतात सापडला महिलेचा मृतदेह
दरम्यान, पत्नी गायब झाल्यावर तिच्या पालकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. तेव्हाच त्यांना एक मृतदेह उसाच्या शेतात आढळला.
एका शेतात पाणी घालत असताना शेताच्या मालकाला महिलेचा मृतदेह आढळून आला. ज्यानंतर त्याने तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून या खून प्रकरणात तपास सुरू केला.
आरोपी पतीने दिली हत्येची कबुली
पोलिसांनी आरोपी पती दिवानसब कागडल याला सगळ्यात आधी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. याशिवाय या प्रकरणात पतीच्या कुटुंबातील अनेक सदस्यांविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पती, भाऊ आणि इतर सदस्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> मामीचे भाच्यासोबत अनैतिक संबंध, मंजूचा मजनू झालेल्या आकाशने मामासोबतच केला कांड!
कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेचा तपास सुरू
पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, पतीसह कुटुंबातील काही सदस्यांचाही या हत्येत सहभाग होता. महिलेच्या पालकांनी अशीही तक्रार केली आहे की हत्येचा संपूर्ण कट कुटुंबातील अनेक सदस्यांनी रचला होता. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात आहे जेणेकरून सर्व दोषींना शिक्षा व्हावी.
ADVERTISEMENT
