Beed Crime : बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला गावातील एका चावडीत बांधले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 10 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनेनं संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे. या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : '...मग गॅस सिलिंडरसाठी रांगा का?' उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांसह केंद्र सरकारला थेट सवाल
पीडितेचा विवाह हा बालवयात झाल्याची माहिती याच प्रकरणामुळे समोर आली. यामुळे पती, सासू-सासरे आणि तत्कालीन विवाहावेळी जे ग्रामसेवक आणि सरपंच होते त्यांनावर देखीलर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.
नेमकं काय घडलं होतं?
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका अल्पवयीन मुलीला घरातून मध्यरात्री अपहण करून तिच्यावर अत्याचार केला होता. नंतर तिला गावातील एका सार्वजनिक चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आला होता. ही घटना 10 मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
नराधमाचं नाव वैभव गिताराम पटेकर याने रात्री तीन वाजता घरात प्रवेश केला. त्याने पीडितेचं तोंड दाबले आणि तिच्यावर बळजबरी केली आणि एका नदी किनारी नेऊन तिच्यावर पाशवी आत्याचार केले होते. यामुळे पीडितेला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरावर प्रचंड यातना भोगाव्या लागल्या आहेत.
संबंधित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने गावातील एका मध्यभागी असलेल्या चावडीवर आणले, तिथे तिला एका खांबाला बांधून ठेवले होते आणि घटनास्थळावरून पसार झाला होता. पीडिता वेदनेनं व्हिवळत तिथेत पडून होती. अखेर पीडितेनं अन्यायाविरुद्ध आवाज उठवून कुटुंबासह पिंपळनेर गाठून वैभव पटेकरविरुद्ध फिर्याद नोंदवली होती. पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा : नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन
बालविवाह केल्याप्रकरणी सासू-सासऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
तसेच याच प्रकरणात पीडितेचा बालविवाह झाल्याने सासू-सासरे, नवरा, तसेच तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











