Covid-19 Update : भारतात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 2019-20 मध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने यंदा 2025 मध्येही डोकं वर काढलं आहे. विशेषत: केरळ, महराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या वाढल्याचं समोर आलं आहे, यामुळे आरोग्य अधिकारी आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यात स्थिती नियंत्रणात आहे. येथील कोरोना रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढतेय
राज्यातही कोव्हिड-19 चे रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 26 मे पर्यंत राज्यात 209 सक्रीय रुग्णांची प्रकरणं समोर आली आहेत. मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, मुंबईत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने म्हटलंय की, JN.1 व्हेरिएंट राज्यातही पसरला आहे. याचसोबत Eris (EG.5) आणि NB.1.8.1 व्हेरिएंटही पसरल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा >> गँगरेपनंतर नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून आतडीच... प्रचंड चीड आणणारी घटना
केरळमध्ये सर्वात जास्त सक्रीय रुग्ण
केरळमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. सध्याच्या रिपोर्टनुसार, 26 मे पर्यंत केरळमध्ये 430 सक्रिय रुग्णांची नोंद झालीय. देशातील हा सर्वाधिक आकडा आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, JN.1 (ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट) आणि NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंट्समुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंट्सला 'Variations Under Monitoring' च्या श्रेणीत ठेवलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती?
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत नियंत्रणात आहे. 26 मे पर्यंत राज्यात फक्त 15 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा >> नवीन जीन्समुळे घेतला जीव, मोठ्या भावाने धाकट्या भावासोबत केलं असं काही...
सावधानता बाळगणं खूप महत्त्वाचं
- गर्दीचे ठिकाणी उदा. बस स्टॉप, रल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी, लग्नसमारंभाज मास्क लावून जा.
- नियमितपणे साबणाने हात धुवा.
- ताप, खोकला, घसा दुखणे, अशी लक्षणं असल्यास लगेच टेस्ट करा.
- आजारी माणसांच्या संपर्कात येऊ नका.
ADVERTISEMENT
