भारताचे ऑईल टँकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणण्यास इराणची परवानगी, एस जयशंकर यांच्या 'फोनाफोनी'ने निघाला मार्ग

Indian oil to get safe passage through Hormuz after Jaishankar's call to Iran : इराणच्या IRGC ने यापूर्वी हा सागरी मार्ग बंद करण्याची घोषणा केली होती आणि कोणत्याही जहाजावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री Sergey Lavrov  आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री Jean-Nol Barrot  यांच्याशीही संवाद साधून या प्रदेशातील स्थिरता राखण्याबाबत चर्चा केली होती. या  राजकीय प्रयत्नांमुळेच भारताला या युद्धसदृश परिस्थितीत सुरक्षित कॉरिडॉर मिळवण्यात यश आले असून, यामुळे कच्च्या तेलाची आणि एलपीजीची (LPG) आयात सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

Indian oil to get safe passage through Hormuz

Indian oil to get safe passage through Hormuz

मुंबई तक

12 Mar 2026 (अपडेटेड: 12 Mar 2026, 01:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारताचे ऑईल टँकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणण्यास इराणची परवानगी

point

भारत आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बातचीत

Indian oil to get safe passage through Hormuz after Jaishankar's call to Iran :  Middle East मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठ्या राजकीय चर्चेची मोहीम फत्ते केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर, इराणने 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' या अत्यंत संवेदनशील समुद्री मार्गातून भारतीय तेलवाहू जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या या भागात युद्धजन्य परिस्थिती असल्याने इराणने अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देशांशी संबंधित जहाजांवर निर्बंध घातले आहेत, मात्र भारताची गरज आणि मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन भारताला हा मोठा दिलासा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती 'इंडिया टुडे'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : डॉक्टरांनी महिलेला 'ब्रेन डेड' घोषित केलं, व्हेंटिलेटर काढलं; अंत्यसंस्काराची तयारी अन् रुग्णवाहिकेतून नेताना जागी झाली

ही राजकीय चर्चा प्रामुख्याने भारताचा इंधन पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्यासाठी करण्यात आली होती. इराणच्या IRGC ने यापूर्वी हा सागरी मार्ग बंद करण्याची घोषणा केली होती आणि कोणत्याही जहाजावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री Sergey Lavrov  आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री Jean-Nol Barrot  यांच्याशीही संवाद साधून या प्रदेशातील स्थिरता राखण्याबाबत चर्चा केली होती. या  राजकीय प्रयत्नांमुळेच भारताला या युद्धसदृश परिस्थितीत सुरक्षित कॉरिडॉर मिळवण्यात यश आले असून, यामुळे कच्च्या तेलाची आणि एलपीजीची (LPG) आयात सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

देशांतर्गत एलपीजी टंचाई आणि वाढत्या किमती; पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

दुसरीकडे, पश्चिम आशियातील या संघर्षाचा परिणाम भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. व्यापारी वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद झाल्याची माहिती समोर येत असून, व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजारही वाढला आहे. अनेक ठिकाणी एका सिलिंडरसाठी 2,000 ते 2,500 रुपये मोजावे लागत आहेत. 7 मार्च रोजीच घरगुती सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. एलपीजी पुरवठ्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना आणि चुकीच्या माहितीला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. हा पेचप्रसंग जागतिक घडामोडींमुळे निर्माण झाला असून केवळ भारतापुरता मर्यादित नाही, असे स्पष्ट करत पंतप्रधानांनी विरोधकांच्या नरेटिव्हला खोडून काढण्याचे आवाहन केले आहे. इराणकडून मिळालेल्या दिलासादायक बातमीमुळे आता लवकरच पुरवठा साखळी पूर्वपदावर येईल आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवणे सरकारला शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वहिणी 'नाही' म्हटल्याने सलून चालकाने केले कांड, वहिणीसह चिमुकल्या पुतणींवर फेकले ॲसिड; पोलिसांनाही दिला गुंगारा
 

    follow whatsapp