मुंबईहून गावी चालला होता बाप, कुटुंब पाहत होतं वाट, उचक्यांचं निमित्त अन् अचानक रेल्वेतच होत्याचं नव्हतं झालं

Death Incident : मुंबईहून आपल्या घरी एक पुरुष घरी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्या, त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ट्रेनमध्ये पुरुषाला प्रवासादरम्यान 4-5 उचक्या आल्या आणि नंतर त्यांचा जीव गेला.

Death incident

Death incident

मुंबई तक

20 Nov 2025 (अपडेटेड: 20 Nov 2025, 03:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फूलचंद यांना अचानकपणे रेल्वेत उचक्या

point

कुटुंब पाहत होते वाट 

point

ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं? 

Death Incident : मुंबईहून आपल्या घरी एक पुरुष घरी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्या, त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ट्रेनमध्ये पुरुषाला प्रवासादरम्यान 4-5 उचक्या आल्या आणि नंतर त्यांचा जीव गेला. प्रवाशांनी या धक्कादायक प्रकरणाची माहिती झांसी रेल्वे पोलिसांना दिली आणि रेल्वेतून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. सांगण्यात येत आहे की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यामागे पाच मुली आहे. मृत पुरुषाचे नाव फूलचंद निषाद (वय 45) असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लोकलमध्ये हिंदी बोलणं जीवावर बेतलं, मराठी तरुणाला मराठी लोकांकडूनच मारहाण; आत्महत्येने झाला शेवट

ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, फूलचंद निषाद हे बस्ती जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील रहिवासी होते. या प्रकरणात बलराम नावाच्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, फूलचंद हा मुंबईमध्ये लेबर इंचार्च म्हणून काम करत होते. त्यांचं सर्वकाही व्यवस्थित सुरु होते, त्यांना पाच मुली देखील आहेत. 

फूलचंद्र यांना अचानकपणे उचक्या

गावाकडे सध्या शेतीच्या कामाचा हंगाम असल्याने तो मुंबईहू गावी निघाला होता. सर्व प्रवाशी हे कुशीनगर एक्सप्रेसमधील जनरल कोचमध्ये बसलेले होते. 5 किमी अंतरावर झांशी स्टेशन होते, तेव्हा फूलचंद यांना अचानकपणे उचक्या लागू लागल्या. अशातच फूलचंदचा लोकलमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 

हे ही वाचा : गावातील तरुणाशी प्रेम विवाह, कुटुंबाची तळपायाची आग मस्तकात गेली, पोटच्या पोरीला गोळ्या घालून संपवलं

कुटुंब पाहत होते वाट 

परिस्थिती पाहून कोचमधील प्रवाशांनी झाशी रेल्वे स्थानकावरील जीआरपी टीमला माहिती दिली. त्याची तपासणी केल्यानंतर रेल्वे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रेल्वे पोलिसांनी रेल्वेतून मृतदेह बाहेर काढला आणि नंतर त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबात मोठा शोककळा पसरली आहे. मृत फूलचंदची पत्नी आणि त्याच्या मुली आपल्या वडिलांची वाट पाहत होत्या. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच फूलचंद्रच्या कुटुंबाने टाहो फोडला. जीआरपी स्टेशन प्रभारी रवींद्र मिश्रा म्हणाले की, मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात आहे आणि अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट झालेलं नाही. 

    follow whatsapp