Ganesh Festival : आज 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी राज्यातच नाही,तर देशभरात गणपती बप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईसह पुणे शहरात पोलिसांची सणाला कसलंही गालबोट लागू नये यासाठी करडी नजर असणार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी सणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेची तयारी केली आहे. विशेषत: नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अनेक मोठ्या गणपती मंडळांवर, मुंबईतील विविध भागांमध्ये आणि विसर्जन स्थळांवर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मनोज जरांगेंनी केली गणपती बप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?
AI कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर
गणेशोत्सवादरम्यान, मुंबई पोलीस वापरण्यात आलेले कॅमेरे भविष्यात संपूर्ण शहरात बसवण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. या एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर करडी नजर राहणार आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांना ऑपरेटरला रिअल टाइम अपडेट्स पाठवतील.
यासाठी गर्दीच्या परिस्थितीत सुरक्षेत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून भाविकांच्या हालचालींवर हे कॅमेरे लक्ष ठेवतील. मुंबईतील एकूण सुप्रसिद्ध गणपती, तसेच लालबा परिसरातील गणपतीच्या मंडपांमध्ये आणि विसर्जन स्थळांवर सुमारे 300 एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 10 दिवसांच्या गणेशोत्सव सणाला कसलंही गालबोट लागू नये, तसेच अनुचित प्रकार घ़डू नये यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर एकूण 17 हजार 600 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच 11 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जाते.
हे ही वाचा : डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करावी की उजव्या? काय सांगतं शास्त्र?
हजारो मुंबई पोलीस ऑन ड्युटी
गणेश मंडळे आणि मूर्ती विसर्जन स्थळांवर मोठीगर्दी दिसते. त्यामुळे उत्सवादरम्यान, शहरात किमान 15 हजार पोलीस कॉन्स्टेबल, 2 हजार 600 उपनिरीक्षक आणि निरीक्षकांचा समावेश आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
