बीड : ऊसाच्या फडात वयोवृद्ध वारकऱ्याचा जळालेला मृतदेह आढळला, आत्महत्येचा संशय; नेमकं काय घडलं?

Beed Crime : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Beed Crime

Beed Crime

मुंबई तक

14 Mar 2026 (अपडेटेड: 14 Mar 2026, 12:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऊसाच्या फडात वयोवृद्ध वारकऱ्याचा जळालेला मृतदेह आढळला

point

आत्महत्येचा संशय

point

नेमकं काय घडलं?

Beed Crime, रोहिदास हातागळे : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : 'मासे तू खाल्लेस की उंदराने..' दगडाने ठेचून मित्रांनी केली हत्या; 50 कचरा वेचकांच्या चौकशीतून भयंकर गुन्ह्याचा उलगडा

ऊसाच्या सरीत सापडला मृतदेह

ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

टीबीमुळे मानसिक तणावात

मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित (M.A.) होते आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते टीबी (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे ते मानसिक तणावात असल्याची चर्चा गावात आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

हे ही वाचा : Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश

..तर ही घटना घडली नसती

शेतकरी दिलीप देशमुख यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शेजारील शेतकरी सुरेश बुरगे यांनी शेत रस्ता अडवल्यामुळे त्यांचा ऊस कारखान्याला जाऊ शकला नाही. 'रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज देऊनही प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही. रस्ता मिळाला असता तर ऊस आधीच तुटला असता आणि ही दुर्दैवी घटना घडली नसती,' असे देशमुख यांनी म्हटले आहे.

पोलिस तपास काय सांगतो?

मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 'आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले असावे असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल,' अशी माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

    follow whatsapp