Maharashtra Weather : राज्यात दिवाळी सणाला गुलाबी थंडी विसरा, 'या' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 19 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 19 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार

point

19 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान तर...

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 19 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तर काही ठिकाणी मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाच्या परिस्थितीची शक्यता आहे. तर जाणून घ्या 19 ऑक्टोबर रोजी कसा असेल हवामानाचा अंदाज, हे पुढे नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नंदूरबार: देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली तब्बल 6 भाविकांचा गेला जीव अन्...

कोकण विभाग : 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी पालघर, ठाणे आणि मुंबईत कोरडं हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. 

मध्य महाराष्ट्र विभाग : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर  या जिल्ह्यात  हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा विभाग :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. 

हे ही वाचा : विकृतीचं टोक! पुण्यात तरुणाने श्वानावर केले लैंगिक अत्याचार, धक्कादायक प्रकरण कॅमेऱ्यात कैद, प्राणी मित्रांचा संताप

विदर्भ विभाग : 

राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांना कसलीही चेतावणी दिली नाही. 

    follow whatsapp