Maharashtra Weather : देशात यंदा मान्सूनने 10 - 12 दिवसापूर्वीच म्हणजेच 26 मे रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली. यानंतर हवामान खात्याने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला होता. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. यानंतर सोमवारी (2 जून) रोजी मान्सूनचा प्रभाव संपूर्ण राज्यात कायम राहणार आहे. पावसाचा जोर हा प्रत्येक ठिकाणानुसार बदलण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पोहताना दम भरला, गटांगळ्या खाल्ल्या, चौघांचा तलावात बुडून मृत्यू
2 जून रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मान्सून हलका ते मध्यम स्वरुपाचा आहे. तसेच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दिवशी वातावरण ढगाळ राहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
कोकणात या भागात मुसळधार पाऊस
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात 2 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 100 - 150 मिमी पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. सखल भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होईल. तर कोकणाला समुद्र जवळ असल्याने पावसाचा वेग वाढू शकेल. याचा परिणाम हा कोकणातील ग्रामीण भागातील शेतीवर होईल.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील मान्सूनची स्थिती
कोकणानंतर आता मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरात हलका ते मध्यमस्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सोलापूरात वातावरण ढगाळ राहून तुरळक पाऊस पडेल. तर मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागात कमी दाबाचे केंद्र सक्रिय असल्याने हलका ते मध्यम पाऊस पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
मराठवाड्यात वापसाचा येलो अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा येथे ढगाळ वातावरण असेल. तर उत्तर विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि धुळे येथे हवामान खात्याने तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा : नातेवाईकांचा प्रचंड विरोध! नवऱ्याने पोलीस ठाण्यातच नवरीला लावलं सिंदूर, नेमकं घडलं तरी काय?
शेतकऱ्यांनी पिकांची घ्याली काळजी
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने काही सूचना जारी केल्या आहेत. यासाठी पेरणीचे नियोजन करावं, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांनी पेरणी करताना सावधगिरी बाळगावी असा हवामान खात्याने इशारा दिला आहे. तसेच पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, 2 जून रोजी मुंबई ठाणे आणि पुण्यात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मुंबईतील लोकल ट्रेन आणि वाहतुकीवर या मान्सूनचा मोठा परिणाम होईल. यासाठी नागरिकांना झाडाखाली थांबू नये.
ADVERTISEMENT
