Maharashtra Weather Update : राज्यात 16 जून रोजी ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पालघरमध्ये पावसाने दमदार बॅटींग केली आहे. तर अशातच 17 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 12 जून रोजी मान्सूनच्या वेगात वाढ दिसून आल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Rain Update: पुढील 3 तास धोक्याचे, IMD कडून ठाणे जिल्ह्यासाठी Red अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस
मान्सूनच्या सर्वसाधारण अंदाजानुसार, यंदा मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल झाला आहे. 12 ते 17 जून या कालावधीत हवामान खात्याने मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा त्यामध्ये समावेश आहे.
कोकणात अतिमुसळधार मान्सून
कोकणचा विचार केल्यास, 17 जून रोजी किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धिंगाण घालणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई उपनगरात पाऊस धिंगाणा घालणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा असून पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सातारा, सांगली आणि कोल्हापूरात काय आहे मान्सून स्थिती
मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस धिंगाणा घालणार आहे. या भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला द्यावा, करण पावसाचा जोर अधिक वाढू शकतो.
मराठवाड्यात मान्सूनचा जोर कायम
मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊसाचा जोर असणार आहे. 13 जूननंतर मान्सून सक्रिय झाल्याने काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात पूर्णपणे मान्सून सक्रिय नाही
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला दिसत नाही. त्यामुळे पावसाचा जोर हा कमी असणार आहे. नागपूरसारख्या भागात उष्ण ते दमट हवामानचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : वाढदिवस साजरा करण्यासाठी टोळक्यानं पुरूषाचा केला खून, नेमकं काय घडलं?
अशातच मुंबई आणि कोकणात पूरजन्यस्थिती निर्माण होऊ शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नदी-नाल्यांपासून दूर राहावं. भरतीच्या वेळी सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यामुळे सावधगिरी बाळगावी असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
